शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काश्मीरमध्ये राजकारण तापले; मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, 'काहीतरी मोठा प्लॅन आखला जातोय...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 21:49 IST

ट्विटरवरुन मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपावर निशाना साधला आहे.

नवी दिल्ली : गुप्तचर यंत्रणांकडून अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केल्यानंतर यात्रेकरु आणि पर्यटकांना काश्मीरमध्ये थांबण्याचा कालावधी कमी करण्यास तसेच लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. याशिवाय, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणेच्या 280 अतिरिक्त तुकड्या(28 हजार जवान) तैनात केल्या आहेत. यावरुन येथील राजकीय वातावरण तापले आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. बारामुलामध्ये पत्रकारांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'जर भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भाषणे ऐकली आणि खोऱ्यात केंद्रीय सुरक्षा दलाची तैनात पाहिली तर काश्मीरच्या कोणत्याही नागरिकांमध्ये शंका निर्माण होऊ शकते. केंद्रीय सुरक्षा दल  हे राज्यातील पोलिसांची डोळेझाक करत आहे. हे सर्व पाहिले तर असे सूचित होते की काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत आहे.'

(अमरनाथ यात्रा स्थगित, दहशतवादी हल्ल्याची शक्यता, भाविकांना परतीच्या सूचना)

याचबरोबर, ट्विटरवरुन मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपावर निशाना साधला आहे. त्या म्हणाल्या, 'तुम्ही (केंद्र सरकार) एकमेव मुस्लिमबहुल राज्याचे प्रेम जिंकण्यास अयशस्वी झाला आहात. ज्याने धार्मिक आधारावर विभाजन रद्द करत धर्मनिरपेक्ष भारताला निवडले. आता काही गोष्टी बदलल्या आहेत आणि भारताने लोकांवर प्रांत निवडला आहे.'  याशिवाय, दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'अर्थव्यवस्था ढासळत आहे. मात्र, मला आशा आहे की नेहमीप्रमाणे काश्मीरचा वापर मुख्य मुद्द्यांना बाजूला सारण्यासाठी होणार नाही.'

दुसरीकडे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही काश्मीर खोऱ्यातील अतिरिक्त जवान आणि सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी अडव्हायजरीवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच, काश्मीरमधील सर्व विरोधी पक्षांनी तात्काळ बैठक बोलविली आहे.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानBJPभाजपा