शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Mayawati vs BJP:  "असे प्रकार वाढत गेल्यास आपला देश दुर्बल होत जाईल"; मायावतींचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 1:26 PM

मायावतींनी भाजपा नेतृत्वावर सडकून टीकाही केली

Mayawati vs BJP: बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी बुधवारी भाजपा नेतृत्वावर सडकून टीका केली. भाजपाचे लोक गरिबी, बेरोजगारी, महागाई आणि इतर गंभीर समस्यांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने धार्मिक मुद्द्यांचा वापर करत आहेत, असं मत मायावती यांनी व्यक्त केलं. तसेच, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे देश दुर्बल होईल आणि धार्मिक स्थळांची किंवा जागांची नावं बदलल्याने धर्माधर्मांत द्वेष वाढेल, अशी भीतीही मायावतींनी व्यक्त केली.

"सध्या भारतात वाढत जाणारी गरिबी व बेरोजगारी तसेच वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, महागाई असे अनेक विषय आहेत. पण केंद्र सरकार मुद्दाम त्या विषयांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या संस्था जाणूनबुजून धर्माशी संबंधित ठिकाणे आणि विषयांबद्दल आवाज उठवत आहेत. मूळ प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी त्यांचा हा प्लॅन आहे आणि हे कोणापासूनही लपलेलं नाही", असं मायावती म्हणाल्या.

"असे प्रकार अशाच प्रकारे वाढत गेले तर परिस्थिती चिघळेल. स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या वर्षांनीही लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला जात आहे. कट रचल्याप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्यानवापी, मथुरा, ताज महाल ही त्याचीच काही उदाहरणं आहेत असं म्हणता येईल. असे प्रकार घडवल्याने तुम्ही भारताला कमकुवत करत आहात. याकडे भाजपाला गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे", असा इशाराही मायावतींनी दिला.

टॅग्स :mayawatiमायावतीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी