शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

गणिताशी छत्तीसचा आकडा, सायन्सशीही (प्र)योग जुळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:28 AM

भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे.

ठळक मुद्देभारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. ताण आणि आपल्या अभ्यासातील कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांमध्ये सर्रास आढळून येतात. विद्यार्थ्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन समजून घेण्यासाठी त्यांनी हे सर्वेक्षण केले होते.

मुंबई - भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. ताण आणि आपल्या अभ्यासातील कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांमध्ये सर्रास आढळून येतात. जवळपास प्रत्येक भारतीयविद्यार्थी परीक्षा काळात अशाच तणावपूर्ण मन:स्थितीतून जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

ब्रेनली ही जगातील सर्वांत मोठी पिअर-टू-पिअर लर्निंग कम्युनिटी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन समजून घेण्यासाठी त्यांनी हे सर्वेक्षण केले होते. मुंबईसह उर्वरित भारतातील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. गणित, विज्ञान विषयाची सर्वाधिक भीती वाटत असल्यानेच ६५% विद्यार्थ्यांनी या दोन विषयांच्या तयारीवर जास्त भर देणार असल्याचे सांगितले; तर आम्ही जी तयारी करतो त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत ६४% विद्यार्थ्यांनी नोंदविले. गणित, विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी अभ्यासाची पद्धत बदलायला हवी, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला.

संगीत ऐकण्यास पसंती

परीक्षेदरम्यान केलेला अभ्यास विसरायला होतो, अशी भीतीही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली. आपल्याकडून असलेल्या इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, सुयश मिळविण्यासाठी हे विद्यार्थी सर्वाधिक संघर्ष करत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकण्याला सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पसंती दिली त्याखालोखाल सिनेमा पाहणे, गेम्स खेळणे, झोप घेणे आदी पर्याय निवडले.

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारतStudentविद्यार्थीscienceविज्ञान