शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

वऱ्हाडी आले, दारू न मिळाल्यानं विधी न करताच बसून राहिले; लग्न मोडण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 7:05 AM

दारुबंदीमुळे आदिवासी युवतीचे लग्न थांबले: बिहारमध्ये सरपंचाला अटक

- एस.पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये दारूबंदी कायद्यामुळे एका आदिवासी युवतीचे लग्न मोडण्याच्या पायरीवर आले आहे. घरी आलेले वऱ्हाडी लग्नाचे विधी न करताच बसून आहेत. ही घटना बांका जिल्ह्यातील बौंसी ठाण्याच्या हद्दीतील लौंगाय पंचायतमधील. आदिवासी परंपरेनुसार देवी-देवतांना नैवेद्य म्हणून दारू सरपंचाच्या हस्ते अर्पण केली जाते. प्रत्यक्षात पोलिसांनी छापा मारून दारू जप्त केली व सरपंचाला तुरुंगात पाठवले. यामुळे लग्न थांबले. दिनेश मुर्मू यांची बहीण बासमती मुर्मूचे लग्न अरविंद मरांडीशी ठरलेले आहे. ५ एप्रिल रोजी वरात गावात आली. आदिवासी परंपरेनुसार सरपंच गोपाळ सोरेन यांनाच लग्नाचे विधी पूर्ण करायचे होते. तेवढ्यात तेथे पोलीस आले व घरात दारू सापडल्याचा आरोप करून त्यांनी सोरेन यांना अटक केली. सरपंचाशिवाय आदिवासी समाजात लग्नाचे विधी होत नाहीत. देवी-देवतांना नैवेद्य म्हणून जवळपास दोन लीटर दारू घरात ठेवली गेली होती. परंतु, पोलिसांचे म्हणणे १३ लीटर दारू जप्त केली. सरपंच आल्यानंतरच लग्न होईल, असे म्हटले जात आहे. वराकडील लोक गावात थांबलेले आहेत. परंपरा अशी की, लग्नानंतरच वर पत्नीला घेऊन गावात प्रवेश करू शकतो, नाही तर युवतीला विधवा घोषित करावे लागेल. त्यामुळे वधूचे वडील अस्वस्थ आहेत.

दिनेश मुर्मू यांचे वडील रसिकलाल मुर्मू यांनी सर्व मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बासमतीचे लग्न होऊ देण्याची मागणी केली आहे. आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी विभागीय कार्यालयात गटविकास अधिकारी अभिनव भारती यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला आहे. माजी आमदार संजय कुमार यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक संजय कुमार म्हणाले,“ दारूबंदी कायद्याचे कठोरपणे पालन केले जात आहे. दारूबंदी कायद्यात कोणत्याही विशिष्ट जातीसाठी वेगळी तरतूद नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच आहे. लग्न होणे किंवा थांबणे हा त्यांचा प्रश्न आहे.” 

टॅग्स :marriageलग्न