शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 22:10 IST

'वक्फ कायद्यावर संसदेत 12-13 तास चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी एक शब्दही बोलले नाही; आता काँग्रेस अधिवेशनात बोलून काय फायदा?'

Congress Meeting : अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधींनी वक्फ दुरुस्ती कायदा, ओबीसी आरक्षण आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा आपला भाषणात उल्लेख केला. आता या भाषणावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी जोरदार हल्लाबोल केला. आज पटेलांवर प्रेम दाखवणाऱ्या काँग्रेसने 41 वर्षे त्यांना भारतरत्न का दिले नाही, हे स्पष्ट करावे? असा सवाल त्यांनी केला.

संसदेत का बोलला नाही?वक्फ दुरुस्ती कायद्याला असंवैधानिक म्हणणाऱ्या राहुल गांधींवर टीका करताना रविशंकर प्रसाद म्हणतात, जेव्हा संसदेत चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी वक्फवर का बोलले नाहीत? कोणत्या मुद्द्यावर काय बोलावे, हे त्यांना कळत नाही. वक्फवर बोलण्यासाठी राहुल गांधींना अहमदाबादची वाट पहावी लागली. सभागृहात 12-13 तास ​​चर्चा झाली, तेव्हा बोलायला हवे होते, आता काँग्रेसच्या अधिवेशनात बोलून काय फायदा? अशी टीका त्यांनी केली. 

काँग्रेसला लाज वाटली पाहिजे...ते पुढे म्हणतात, काँग्रेसच्या अधिवेशनात "सोनिया गांधी हिंदुस्तान, राहुल गांधी हिंदुस्तान" अशी घोषणा दिली जात होती, तेव्हा त्या घोषणा का थांबवल्या नाही? जेपी चळवळीदरम्यान इंदिरा इंज इंडिया, इंडिया इज इंदिरा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे काय झाले, ते तुम्हाला आठवत नाही का? आता तुम्हीही तोच नारा देत आहात? काँग्रेसच्या लोकांना थोडी लाज वाटली पाहिजे. भारत खूप मोठा आहे. भारताची प्रतिष्ठा आणि वारसा आपल्या सर्वांपेक्षा, सर्व पक्षांपेक्षा मोठा आहे.

काँग्रेस नेतृत्वाक किती ओबीसी?राहुल गांधींनी ओबीसींबद्दल चिंता व्यक्त केली. पण, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वात किती ओबीसी आहेत, हे राहुल गांधींनी सांगावे. निर्णय घेण्याचे अधिकार तुमची आई सोनिया, बहीण प्रियांका आणि तुमच्याकडेच आहे. तुमच्या राज्यात कोणी ओबीसी मुख्यमंत्री आहे का? भाजप राज्यांमध्ये अनेक ओबीसी मुख्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्री ओबीसी आहेत. अनेक राज्यांचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय संघटनेतही ओबीसी आहेत, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादwaqf board amendment billवक्फ बोर्ड