शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 11:02 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला आहे, त्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे माजी आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ आणि गृह व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे.

नवी दिल्ली : सध्या जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी येत आहे. आता मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत. गिरीशचंद्र मुर्मू यांच्या राजीनाम्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला आहे, त्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागी केंद्र सरकारने गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्त केले. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोज सिन्हा यांना या पदावर नियुक्त केले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेनंतर गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबरला गिरीशचंद्र मुर्मू यांनी उपराज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती.

राष्ट्रपतींचे पत्रकार सचिव अजय कुमार सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, मनोज सिन्हा यांची नेमणूक त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून लागू होईल. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे माजी आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ आणि गृह व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

ओमर अब्दुल्ला यांचे ट्विटमनोज सिन्हा यांची उपराज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. काल रात्री अशी एक किंवा दोन नावे होती. ज्यांचे नाव समोर आले आहे, त्यांचे नावही त्यात नव्हते. आपण या सरकारवर नेहमीच विश्वास ठेवू शकता की, या स्रोतांसमोर ठेवलेल्या कोणत्याही अनुमानांविरूद्ध एक अनपेक्षित नाव येईल, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर