शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 20:49 IST

Manohar Lal Khattar Remarks: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Manohar Lal Khattar On Jawaharlal Nehru: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. 'जवाहरलाल नेहरू योगायोगाने भारताचे पंतप्रधान झाले. खरं तर, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या पदासाठी पात्र होते', असे म्हणत त्यांनी नवीन वादाला तोंड पोडले आहे. 

हरियाणाच्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात बोलताना खट्टर म्हणतात, 'मला सांगायचे आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले. त्यांच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बी.आर.आंबेडकर यांसारखे लोक पात्र होते. डॉ. आंबेडकरांची भूमिका त्यांच्यापेक्षा कमी नव्हती, पण जे काही झाले घडले, हा त्या काळातील जनतेचा निर्णय होता.'

आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली नाहीखट्टर पुढे म्हणतात, 'या देशाचे संविधान हा आपला पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला आकार देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकरांचे योगदान आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपण वेळोवेळी त्यांचा आठवण काढली पाहिजे. लक्षात ठेवा की, आंबेडकरांनादेखील अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली नाही नव्हती.' 

भाजप सरकारमध्ये आंबेडकरांचा गौरव'सरकार सत्तेवर आल्यानंतर आंबेडकरांच्या नावाशी संबंधित पाच पवित्र स्थळांची स्थापना करण्यात आली. या कार्यकाळात डॉ.आंबेडकरांबद्दल आदर दाखवला गेला, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. आज भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या कोणत्याही नेत्याला सर्वोच्च सन्मान द्यायचा असेल, तर तो नक्कीच डॉ. आंबेडकरांना दिला जाईल, असेही खट्टर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर