शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 20:49 IST

Manohar Lal Khattar Remarks: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Manohar Lal Khattar On Jawaharlal Nehru: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. 'जवाहरलाल नेहरू योगायोगाने भारताचे पंतप्रधान झाले. खरं तर, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या पदासाठी पात्र होते', असे म्हणत त्यांनी नवीन वादाला तोंड पोडले आहे. 

हरियाणाच्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात बोलताना खट्टर म्हणतात, 'मला सांगायचे आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले. त्यांच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बी.आर.आंबेडकर यांसारखे लोक पात्र होते. डॉ. आंबेडकरांची भूमिका त्यांच्यापेक्षा कमी नव्हती, पण जे काही झाले घडले, हा त्या काळातील जनतेचा निर्णय होता.'

आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली नाहीखट्टर पुढे म्हणतात, 'या देशाचे संविधान हा आपला पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला आकार देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकरांचे योगदान आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपण वेळोवेळी त्यांचा आठवण काढली पाहिजे. लक्षात ठेवा की, आंबेडकरांनादेखील अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली नाही नव्हती.' 

भाजप सरकारमध्ये आंबेडकरांचा गौरव'सरकार सत्तेवर आल्यानंतर आंबेडकरांच्या नावाशी संबंधित पाच पवित्र स्थळांची स्थापना करण्यात आली. या कार्यकाळात डॉ.आंबेडकरांबद्दल आदर दाखवला गेला, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. आज भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या कोणत्याही नेत्याला सर्वोच्च सन्मान द्यायचा असेल, तर तो नक्कीच डॉ. आंबेडकरांना दिला जाईल, असेही खट्टर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर