शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 5:01 AM

‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

नवी दिल्ली : ‘आपण एकविसाव्या शतकात आहोत. हे ज्ञान-विज्ञानाचे आणि लोकशाहीचे यूग आहे. हिंसा हा कुठल्याही समस्येवर उपाय नाही. चर्चा आणि शांततेच्या माध्यमातूनच समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यामुळे काही शस्त्राच्या जोरावर समस्येवरचे समाधान शोधणाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’च्या माध्यमातून केले.

‘अलीकडेच अतिरेकी संघटनांच्या ६०० लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे. काही कारणांनी शस्त्र हाती घेणारे हे लोक आता मुख्य प्रवाहात परतले आहेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसला आहे,’ असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपण नक्कीच प्राप्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ‘आसाममध्ये आयोजित ‘खेलो इंडिया’त सहा हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यात ८० विक्रम मोडीत निघाले. यात सर्वाधिक विक्रम मुलींच्या नावावर आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. या माध्यमातून ३ हजार २०० खेळाडूंनी पुढे वाटचाल केली असून त्यांच्या कथाही प्रेरणादायी आहेत.’ स्वच्छता अभियानानंतर लोकसहभागाची भावना आता जल संवर्धनाच्या क्षेत्रातही वाढत आहे. त्यासाठी अनेक व्यापक आणि नवे प्रयत्न देशात सुरू आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यात सहभाग घेत आहे, असेही ते म्हणाले.ब्रू आदिवासींचा उल्लेख‘अलीकडेच देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. १९९७मध्ये वांशिक संघर्षामुळे ब्रू आदिवासींना मिझोराम सोडावे लागले होते. त्यांना त्रिपुरात शरणार्थी म्हणून ठेवण्यात आले. २३ वर्षांपर्यंत मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. कित्येक सरकार आले आणि गेले, पण त्यांच्या समस्यांची दखल घेतली नाही. तरीही त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास होता. आता त्यांना त्रिपुरा येथे जागा आणि घर देण्यात येईल. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे,’ याचाही पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी