शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Mann Ki Baat : 'मन की बात' मधून रेडिओला 'डबल' फायदा; लोकप्रियतेसह झाली बक्कळ कमाई, तब्बल 30.80 कोटींचं उत्पन्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 8:37 AM

'Mann Ki Baat' radio programme generated over Rs 30.80 crore revenue : 'मन की बात' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली. याचा डबल फायदा झाला असून बक्कळ कमाई देखील केली आहे.

नवी दिल्ली - संवादाच्या नव्या माध्यमांमध्ये घुसमटत असलेल्या रेडिओला 'मन की बात' या कार्यक्रमाने (Mann Ki Baat) नवसंजीवनी दिली आहे. रेडिओसाठी हा प्रयोग एक वरदान ठरला आहे. 'मन की बात' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली आहे. याचा डबल फायदा झाला असून बक्कळ कमाई देखील केली आहे. 2014 मध्ये 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामुळे 30.80 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. 2017-18 मध्ये सर्वाधिक कमाई ही 10.64 कोटी झाली. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thaku ) यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण हे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध चॅनलवर महिन्यातील शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता केलं जातं. प्रसार भारतीने आपल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत मन की बात कार्यक्रमाच्या 78 एपिसोडचं प्रसारण केलं आहे. तसेच हा कार्यक्रम वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केला जात असल्याची माहिती देखील ठाकूर यांनी दिली आहे. भाजपाचे खासदार राकेश सिन्हा यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाने रेडिओची लोकप्रियता वाढली आहे का? आणि नवसंजीवनी मिळाली आहे का? प्रश्न करण्यात आला होता. 

अनुराग ठाकूर यांनी याला हो, असं उत्तर दिलं आहे. 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. हा एक अभिनव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाला जोडला जातोय, सूचना मागवल्या जात आहेत आणि त्यांना शासनाचा एक भाग होण्याची संधीही दिली जात आहे असं ठाकूर म्हणाले. दूरदर्शनचे 34 चॅनेल्स आणि जवळपास 91 खासगी टीव्ही चॅनेल्सद्वारे संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची संख्या ही 11.8 कोटी इतकी आहे. या कार्यक्रमामुळे पारंपरिक रेडिओमध्ये नागरिकांची रुची वाढली असून जागरूकताही निर्माण झाली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.

2017-18, 2018-19, 2019-20, 2020-21मध्ये आकाशवाणीला किती उत्पन्न मिळाले? असा प्रश्न करण्यात आला. याबद्दलही माहिती ठाकूर यांनी दिली आहे. ‘2017-18 मध्ये 10,64,27,300 कोटी रुपये, 2018-19 मध्ये 7,47,00,000 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 2,56,00,000 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 1,02,00,000 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. 2014 पासून ते आतापर्यंत 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीला 30.80 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक उत्पन्न हे 2017-18 मध्ये मिळाले. सर्वात कमी कमाई ही 2020-21 मध्ये झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा हेतू हा कमाईचा नाही तर सराकरच्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधण्याचा आहे, असं अनुराग ठाकूर यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारत