शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मनमोहनसिंग सुप्रीम कोर्टात

By admin | Updated: March 26, 2015 01:06 IST

विशेष न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित खटल्यात आरोपी करून समन्स जारी करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली.ओडिशातील तलाबिरा-२ या कोळसा खाणपट्ट्याच्या २००५ मध्ये मे. हिंदाल्को कंपनीस केल्या गेलेल्या वाटपाशी संबंधित खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी, डॉ. सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, हिंदाल्को कंपनी व त्या कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी करून ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स काढण्याचा आदेश १२ मार्च रोजी दिला होता. हे खाणवाटप झाले तेव्हा कोळसा खात्याचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान या नात्याने डॉ. सिंग यांच्याकडे होता.डॉ. सिंग यांनी या आदेशाविरुद्ध याचिका केली असून गुरुवारी तातडीने ती खंडपीठापुढे आणून समन्सला अंतरिम स्थगिती देण्याची किंवा डॉ. सिंग यांना विशेष न्यायालयात जातीने हजर न राहण्याची मुभा देण्याची विनंती केली जाईल, असे समजते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी इतर ज्येष्ठ नेत्यांसह डॉ. सिग यांच्या घरी जाऊन पक्ष त्यांच्यामागे ठापमणे उभा असल्याची ग्वाही याआधीच दिली आहे. त्यामुळे पक्षातर्फे कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम, सल्मान खुर्शीद, अभिषेक मनु सिंघवी अशा दिग्गज वकिलांची फौज उभी केली जाईल, असे समजते.तलिबिरा खाणपट्टा हिंदाल्कोला देण्यास आपण मंजुरी दिली हे खरे असले तरी या व्यवहारात गुन्हेगारी मानसिकता अथवा ‘देवाण-घेवाणी’चा अन्योन्य संबंध कुठेही नव्हता. म्हणजेच फौजदारी कट आणि विश्वासघात या गुन्ह्यांची पूर्तता होण्यासाठी आवश्यक बाबी सकृतद्दर्शनी दिसत नसूनही आरोपी करून समन्स काढणे सर्वस्वी चुकीचे व बेकायदा आहे. हे खाणवाटप झाले तेव्हा कोणतेही निश्चित कोळसा धोरण ठरलेले नव्हते, त्यामुळे डॉ. सिंग यांनी हिंदाल्को कंपनीस ‘फेवर’ करण्यासाठी हा निर्णय घेतला, असा निष्कर्ष काढणेही चुकीचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीबीआय विशेष न्यायालय हे सत्र न्यायालय दर्जाचे न्यायालय आहे. त्यामुळे प्रचलित यंत्रणेनुसार त्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात अपील व्हायला हवे होते. परंतु कोळसा खाणवाटप प्रकरण त्यास अपवाद आहे.या खटल्यांसाठी खास न्यायालय स्थापन करण्याचे व तेथे हे खटले विनाविलंब चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ११ एप्रिल २०११ व ९ नोव्हेंबर २०१२ रोजी दिले तेव्हाच, विशेष न्यायालयाच्या कोणत्याही अंतरिम आदेशाविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाद मागता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.