शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

'वर्दीतला माणूस'... 8 वर्षापूर्वी सापडलेल्या अनाथ मुलीचं 'पोलीस बापानं केलं कन्यादान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 20:38 IST

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत.

नवी दिल्ली - पोलिसांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. तसेच, पोलीस म्हणजे भ्रष्टाचारी, गरिबांची पिळवणूक करणारे असाही समज अनेकांचा असतो. मात्र, काही पोलीस आपल्या कृतीतून पोलिसांबद्दलचा हा समज पुसून टाकतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्यानेही पोलिसांबद्दल लाख-मोलाचा आदर वाटावा, असे कृत्य केले आहे. लखनौच्या चौक ठाण्यातील अखिलेश मिश्र यांनीही आपल्या खाकी वर्दीत लपलेला माणूस समाजाल दाखवून दिला आहे. 

लखनौ चौक ठाण्यातील पोलीस निरीक्षक अखिलेश मिश्र यांना आठ वर्षांपूर्वी एक अनाथ मुलगी भेटली होती. त्यावेळी गुडम्बा पोलीस ठाण्यात अखिलेश आपले कर्तव्य बजावत होते. या कर्तव्यावर असताना भेटलेल्या 10 वर्षीय मुलीला अखिलेश यांनी सोबत घेऊन आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले. विशेष म्हणजे नुकतेच या मुलीचे लग्न लावून अखिलेश यांनी कन्यादानही केले. जौनपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याला पोलीस खात्यातील लोकांसह अनेकांनी मोठी गर्दी केली होती. 

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. जवळपास 8 वर्षांपूर्वी गुडम्बा ठाण्यात कर्तव्य बजावत असताना, अखिलेश यांना भटंकती करणारी 10 वर्षीय मुलगी भेटली होती. त्यावेळी, अखिलेश यांनी मुलीला तिच्याबद्दल विचारपूस केली. मात्र, तिला काहीही सांगता आले नाही, तर पोलीस यंत्रणांचे सहकार्य घेऊनही तिच्या कुटुंबीयांबद्दल अखिलेश यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखिलेश यांनी अखेर तिला आपल्या घरी आणले. अगोदरच, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असलेल्या अखिलेश यांनी कुटुंबातील पाचवे अपत्य बनवून या अनाथ मुलीच्या पित्याची जबाबदारी निभावली. 

अखिलेश यांनी तनु मिश्रा असे या मुलीचे नाव ठेऊन तिला शिक्षणही दिले. त्यानंतर, मुलगी लग्नायोग्य होताच, जौनपूर येथील घनश्याम उपाध्याय यांचा मुलगा पंकजसोबत तिचे लग्न लाऊन दिले. गेल्या महिन्यातील 20 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला. अखिलेश यांनी आपल्या तुलापूर या मूळगावी वडिलांची जबाबदारी पार पाडत तनुचे थाटामाटात लग्न लावले. त्यामुळे अखिलेश यांच्या या कृतीचे संपूर्ण पोलीस दल आणि जिल्ह्यातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या कुटुंबापासून दूरावल्यानंतर तनुला मानसिक धक्का बसला होता. मात्र, अखिलेश यांच्या कुटुंबात मला खूप प्रेम मिळाल, या मी या कुटुंबाचाच भाग बनले. त्यामुळे अखिलेश हे माझ्यासाठी केवळ वडिल नसून देवच असल्याचं तनुने लग्नावेळी म्हटले. अखिलेख यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाबद्दल कृतज्ञता वाढीस लागली असून समाजाने वर्दीतली माणूसकी पाहिली आहे.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ