शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

'वर्दीतला माणूस'... 8 वर्षापूर्वी सापडलेल्या अनाथ मुलीचं 'पोलीस बापानं केलं कन्यादान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 20:38 IST

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत.

नवी दिल्ली - पोलिसांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. तसेच, पोलीस म्हणजे भ्रष्टाचारी, गरिबांची पिळवणूक करणारे असाही समज अनेकांचा असतो. मात्र, काही पोलीस आपल्या कृतीतून पोलिसांबद्दलचा हा समज पुसून टाकतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्यानेही पोलिसांबद्दल लाख-मोलाचा आदर वाटावा, असे कृत्य केले आहे. लखनौच्या चौक ठाण्यातील अखिलेश मिश्र यांनीही आपल्या खाकी वर्दीत लपलेला माणूस समाजाल दाखवून दिला आहे. 

लखनौ चौक ठाण्यातील पोलीस निरीक्षक अखिलेश मिश्र यांना आठ वर्षांपूर्वी एक अनाथ मुलगी भेटली होती. त्यावेळी गुडम्बा पोलीस ठाण्यात अखिलेश आपले कर्तव्य बजावत होते. या कर्तव्यावर असताना भेटलेल्या 10 वर्षीय मुलीला अखिलेश यांनी सोबत घेऊन आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले. विशेष म्हणजे नुकतेच या मुलीचे लग्न लावून अखिलेश यांनी कन्यादानही केले. जौनपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याला पोलीस खात्यातील लोकांसह अनेकांनी मोठी गर्दी केली होती. 

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. जवळपास 8 वर्षांपूर्वी गुडम्बा ठाण्यात कर्तव्य बजावत असताना, अखिलेश यांना भटंकती करणारी 10 वर्षीय मुलगी भेटली होती. त्यावेळी, अखिलेश यांनी मुलीला तिच्याबद्दल विचारपूस केली. मात्र, तिला काहीही सांगता आले नाही, तर पोलीस यंत्रणांचे सहकार्य घेऊनही तिच्या कुटुंबीयांबद्दल अखिलेश यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखिलेश यांनी अखेर तिला आपल्या घरी आणले. अगोदरच, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असलेल्या अखिलेश यांनी कुटुंबातील पाचवे अपत्य बनवून या अनाथ मुलीच्या पित्याची जबाबदारी निभावली. 

अखिलेश यांनी तनु मिश्रा असे या मुलीचे नाव ठेऊन तिला शिक्षणही दिले. त्यानंतर, मुलगी लग्नायोग्य होताच, जौनपूर येथील घनश्याम उपाध्याय यांचा मुलगा पंकजसोबत तिचे लग्न लाऊन दिले. गेल्या महिन्यातील 20 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला. अखिलेश यांनी आपल्या तुलापूर या मूळगावी वडिलांची जबाबदारी पार पाडत तनुचे थाटामाटात लग्न लावले. त्यामुळे अखिलेश यांच्या या कृतीचे संपूर्ण पोलीस दल आणि जिल्ह्यातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या कुटुंबापासून दूरावल्यानंतर तनुला मानसिक धक्का बसला होता. मात्र, अखिलेश यांच्या कुटुंबात मला खूप प्रेम मिळाल, या मी या कुटुंबाचाच भाग बनले. त्यामुळे अखिलेश हे माझ्यासाठी केवळ वडिल नसून देवच असल्याचं तनुने लग्नावेळी म्हटले. अखिलेख यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाबद्दल कृतज्ञता वाढीस लागली असून समाजाने वर्दीतली माणूसकी पाहिली आहे.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ