शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

'वर्दीतला माणूस'... 8 वर्षापूर्वी सापडलेल्या अनाथ मुलीचं 'पोलीस बापानं केलं कन्यादान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 20:38 IST

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत.

नवी दिल्ली - पोलिसांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. तसेच, पोलीस म्हणजे भ्रष्टाचारी, गरिबांची पिळवणूक करणारे असाही समज अनेकांचा असतो. मात्र, काही पोलीस आपल्या कृतीतून पोलिसांबद्दलचा हा समज पुसून टाकतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्यानेही पोलिसांबद्दल लाख-मोलाचा आदर वाटावा, असे कृत्य केले आहे. लखनौच्या चौक ठाण्यातील अखिलेश मिश्र यांनीही आपल्या खाकी वर्दीत लपलेला माणूस समाजाल दाखवून दिला आहे. 

लखनौ चौक ठाण्यातील पोलीस निरीक्षक अखिलेश मिश्र यांना आठ वर्षांपूर्वी एक अनाथ मुलगी भेटली होती. त्यावेळी गुडम्बा पोलीस ठाण्यात अखिलेश आपले कर्तव्य बजावत होते. या कर्तव्यावर असताना भेटलेल्या 10 वर्षीय मुलीला अखिलेश यांनी सोबत घेऊन आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले. विशेष म्हणजे नुकतेच या मुलीचे लग्न लावून अखिलेश यांनी कन्यादानही केले. जौनपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याला पोलीस खात्यातील लोकांसह अनेकांनी मोठी गर्दी केली होती. 

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. जवळपास 8 वर्षांपूर्वी गुडम्बा ठाण्यात कर्तव्य बजावत असताना, अखिलेश यांना भटंकती करणारी 10 वर्षीय मुलगी भेटली होती. त्यावेळी, अखिलेश यांनी मुलीला तिच्याबद्दल विचारपूस केली. मात्र, तिला काहीही सांगता आले नाही, तर पोलीस यंत्रणांचे सहकार्य घेऊनही तिच्या कुटुंबीयांबद्दल अखिलेश यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखिलेश यांनी अखेर तिला आपल्या घरी आणले. अगोदरच, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असलेल्या अखिलेश यांनी कुटुंबातील पाचवे अपत्य बनवून या अनाथ मुलीच्या पित्याची जबाबदारी निभावली. 

अखिलेश यांनी तनु मिश्रा असे या मुलीचे नाव ठेऊन तिला शिक्षणही दिले. त्यानंतर, मुलगी लग्नायोग्य होताच, जौनपूर येथील घनश्याम उपाध्याय यांचा मुलगा पंकजसोबत तिचे लग्न लाऊन दिले. गेल्या महिन्यातील 20 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला. अखिलेश यांनी आपल्या तुलापूर या मूळगावी वडिलांची जबाबदारी पार पाडत तनुचे थाटामाटात लग्न लावले. त्यामुळे अखिलेश यांच्या या कृतीचे संपूर्ण पोलीस दल आणि जिल्ह्यातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या कुटुंबापासून दूरावल्यानंतर तनुला मानसिक धक्का बसला होता. मात्र, अखिलेश यांच्या कुटुंबात मला खूप प्रेम मिळाल, या मी या कुटुंबाचाच भाग बनले. त्यामुळे अखिलेश हे माझ्यासाठी केवळ वडिल नसून देवच असल्याचं तनुने लग्नावेळी म्हटले. अखिलेख यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाबद्दल कृतज्ञता वाढीस लागली असून समाजाने वर्दीतली माणूसकी पाहिली आहे.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ