शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

ममता दीदी चेहऱ्यावर हसू फुलवा, लोकशाहीत आलाय...दिल्लीत बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 9:08 AM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत. यासाठी त्या जंतरमंतरवर धरणे करणार आहेत. या रॅलीचे आयोजन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील हजर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बॅनर्जींच्या स्वागताचे आणि खिल्ली उडविणारे बॅनर झळकू लागले आहेत. 

कोलकाता आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी छापा टाकण्यास गेल्यावरून गेल्या आठवड्यात बंगालमध्ये वातावरण तापले होते. यावेळी ममता यांनी दोन दिवसांच्या धरणे आंदोलनामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच 19 जानेवारीला झालेल्या एका रॅलीमध्ये 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. यामुळे आजचे हे आंदोलनही विरोधी पक्षांची एकजूट दाखविण्यासाठी माध्यम बनणार आहे. 

कोलकाताहून दिल्लीला येण्याआधी ममता यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट संपली आहे. 15 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. निवडणुकीनंतर आम्ही नवीन सरकार बनलेली पाहू. देश बदल पाहू इच्छितो. देशातील जनता त्या अखंड भारताला पाहू इच्छितो, जेथे लोकशाही कायम असेल. 

ममता यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांच्या यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि गुजरातला परतावे. हे सरकार एक व्यक्ती आणि एका पक्षाची सरकार आहे, असा आरोप केला होता. या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच देशाची बिग बॉस आहे, असं म्हणत ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा आमच्यासाठी नैतिक विजय आहे. केंद्र सरकारकडून घटनेचं उल्लंघन सुरू आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करू. कोणीही या देशाचं बिग बॉस होऊ शकत नाही. केवळ लोकशाहीच इथली बिग बॉस आहे,' असं ममता म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयात आज जे काही झालं, तो देशाचा, घटनेचा, तरुणांचा विजय आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdemocracyलोकशाहीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल