शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मुख्यमंत्री म्हणतात, माझा फोन टॅप होतोय; पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 9:13 AM

माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच माझा फोन टॅप केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकारांच्या इशाऱ्यावरून होत आहे. यात एक राज्य भाजपशासित आहे. त्यामुळे सध्या जे सुरू आहे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभिर्याने पाहायला हवे, असे आवाहन देखील ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही. तसेच व्हॅाट्सअॅपवरही हीच स्थिती आहे. मी जेव्हा एखाद्याला फोन करते, त्यावेळी कोणीतरी तो ऐकत असतो. तसेच पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यावर नजर ठेवली जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दिला असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावू शकत नाही. तसेच तुम्हाला जर मोकळेपणाने बोलता येत नसेल तर हे कोणत्या प्रकराचे स्वातंत्र्य आहे असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपाबाबत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट करण्यापूर्वी प्रथम आपल्या राज्यातील समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार विरोधी पक्षांवर खोटे आरोप करत आहे. राज्यात रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांची हत्या होत आहे. राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या फोन कॉल्सवर नजर ठेवण्याची यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा