शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की..."; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:15 IST

"काँग्रेस नेत्यासाठी हे लज्जास्पद"; गोयल यांनीही डिवचले

Mallikarjun Kharge Piyush Goyal verbal fight, Congress vs BJP: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प लोकाभिमुख घोषणा टाळून पुढील आर्थिक वर्षासाठी सुधारणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्च ११ टक्क्यांनी वाढवून ११.११ लाख कोटी रुपये केला. आयात शुल्कासह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ आयकर आघाडीवर स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही. परंपरेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनीी अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. मात्र त्यानंतर आज सुरु झालेल्या राज्यसभेच्या कार्यवाही दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळाले.

काँग्रेस नेत्यांसाठी हे लज्जास्पद

झारखंडचे मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील धाडसत्र आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडींवरून राज्यसभेत दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, बिहारमध्ये नितीश सकाळी इकडचा राजीनामा देतात, आणि संध्याकाळी तिकडे (भाजपमध्ये) सामील होऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. पण झारखंडमध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियूष गोयल म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपींच्या समर्थनार्थ काँग्रेसने आवाज उठवणे आणि आमच्यावर आरोप करणे लज्जास्पद आहे. पण भ्रष्टाचार हा काँग्रेसच्याच डीएनएमध्येच आहे.

मल्लिकार्जुन खर्गेंचा 'शब्द'

त्याच सत्रात या दोघांमध्ये देशप्रेमावरुनही वाक्-युद्ध पाहायला मिळाले. राज्यसभेत पियूष गोयल यांनी काँग्रेस देश तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यादरम्यान सभागृहात गदारोळ झाला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, काँग्रेस कधीही देश तोडण्याचे बोलू शकत नाही. मी, मल्लिकार्जुन खर्गे तुम्हाला शब्द देतो की, जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर काँग्रेस त्याला विरोध करेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो.

त्याआधी आज संसदेची कार्यवाही सुरु होताच लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला. भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर काही काळाने कामकाज सुरळीतपणे सुरु झाले.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनRajya Sabhaराज्यसभाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेpiyush goyalपीयुष गोयलBJPभाजपाcongressकाँग्रेस