शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

"मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की..."; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:15 IST

"काँग्रेस नेत्यासाठी हे लज्जास्पद"; गोयल यांनीही डिवचले

Mallikarjun Kharge Piyush Goyal verbal fight, Congress vs BJP: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प लोकाभिमुख घोषणा टाळून पुढील आर्थिक वर्षासाठी सुधारणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्च ११ टक्क्यांनी वाढवून ११.११ लाख कोटी रुपये केला. आयात शुल्कासह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ आयकर आघाडीवर स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही. परंपरेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनीी अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. मात्र त्यानंतर आज सुरु झालेल्या राज्यसभेच्या कार्यवाही दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळाले.

काँग्रेस नेत्यांसाठी हे लज्जास्पद

झारखंडचे मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील धाडसत्र आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडींवरून राज्यसभेत दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, बिहारमध्ये नितीश सकाळी इकडचा राजीनामा देतात, आणि संध्याकाळी तिकडे (भाजपमध्ये) सामील होऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. पण झारखंडमध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियूष गोयल म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपींच्या समर्थनार्थ काँग्रेसने आवाज उठवणे आणि आमच्यावर आरोप करणे लज्जास्पद आहे. पण भ्रष्टाचार हा काँग्रेसच्याच डीएनएमध्येच आहे.

मल्लिकार्जुन खर्गेंचा 'शब्द'

त्याच सत्रात या दोघांमध्ये देशप्रेमावरुनही वाक्-युद्ध पाहायला मिळाले. राज्यसभेत पियूष गोयल यांनी काँग्रेस देश तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यादरम्यान सभागृहात गदारोळ झाला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, काँग्रेस कधीही देश तोडण्याचे बोलू शकत नाही. मी, मल्लिकार्जुन खर्गे तुम्हाला शब्द देतो की, जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर काँग्रेस त्याला विरोध करेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो.

त्याआधी आज संसदेची कार्यवाही सुरु होताच लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला. भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर काही काळाने कामकाज सुरळीतपणे सुरु झाले.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनRajya Sabhaराज्यसभाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेpiyush goyalपीयुष गोयलBJPभाजपाcongressकाँग्रेस