शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

‘आयुष्यमान’साठी महाराष्ट्र अनुत्सुक! मोदींच्या महत्त्वाकांक्षेला स्वपक्षीय खो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:50 AM

देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना अल्पदरात आरोग्यविमा देण्यासाठी केंदातील मोदी सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना राबविण्यास महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन भाजपाशासित राज्यांनीच अनुत्सुकता दर्शविल्याचे कळते.

नवी दिल्ली - देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना अल्पदरात आरोग्यविमा देण्यासाठी केंदातील मोदी सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना राबविण्यास महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन भाजपाशासित राज्यांनीच अनुत्सुकता दर्शविल्याचे कळते.विम्याचा अल्प हप्ता प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांचा आरोग्यविमा देण्याची ही योजना आहे. राज्यांनी ही योजना राबवावीच असे बंधन नाही. इच्छुक राज्यांनी त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी सामजस्य करार करायचा आहे. योजनेचा निम्मा खर्च ही राज्यांनी करायचा आहे. आत्तापर्यंत २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी असे करार केले आहेत.या योजनेचे काम पाहणाऱ्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांनी या योजनेला विरोध केलेला नाही. मात्र याहूनही अधिक लोकांना लाभ देणाºया स्वत:च्या योजना सुरु असताना मध्येच ही केंद्रीय योजना स्वीकारायला ही राज्ये उत्सुक नाहीत.महाराष्ट्र सरकार स्वत:ची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ आधीपासूनच राबवित आहे. या योजनेत २.२ कोटी नागरिकांना वर्षाला दोन लाखांपर्यंतचा आरोग्यविमा दिला जातो. ही योजना बंद करणे योग्य होणार नाही व त्यासोबत केंद्राची योजनाही राबवायचे म्हटले तर त्यासाठी निधी नाही, असे महाराष्ट्राचे म्हणणे असल्याचे या अधिकाºयाने सांगितले.राजस्थान सरकारच्या अनुसुक्ततेचे कारणही तसेच आहे. त्यांच्याकडे राज्य सरकारची ‘भामाशहा स्वास्थ्य विमा योजना’ सुरु आहे. त्यात सुमारे ४.५ कोटी लोकांना विनामूल्य आरोग्यविमा दिला जातो. शिवाय ‘आयुष्यमान योजने’साठी विमा कंपनीशी आता करार केला तर तो पुढील वर्षापर्यंत असेल. त्यामुळे सध्या सुरु अससेल्या राज्यातील योजनेला खीळ न घालता नवी योजना कितपत स्वीकारता येईल, याविषयी राज्य सरकार साशंक आहे. ‘आयुष्यमान भार’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांनी अलिकडेच या संदर्भात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी चर्चाही केली.आमची स्वत:ची याहून अधिक लोकांना लाभ देणारी ‘बिजू स्वास्थ्य कल्याण योजना’ आधीपासून सुरु आहे, असेच कारण देऊन ओडिशा सरकारने केंद्राची योजना राबविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांचा अद्याप निर्णय व्हायचा आहे. मात्र राजकीय मतभेद असूनही ममता बॅनर्जी यांचे प. बंगाल सरकार केंद्राची योजना राबविण्यास तयार झाले हे विशेष.१५ आॅगस्टचा मुहूर्त?संपूर्ण देशात येत्या १५ आॅगस्टपासून ही योजना राबविली जावी, यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील ८.०३ कोटी व शहरी भागांतील २.३३ कोटी कुटुंबे यासाठीचे संभाव्य ‘टार्गेट’ आहे. राज्यांची संमती घेऊन त्यांच्याशी औपचारिक करार करण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आल्याचे योजना राबविण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय आरोग्य एजन्सी या शीर्षस्थ संस्थेने योजनेत सहभागी होणाºया सरकारी व खासगी इस्पितळांची नोंदणी करण्याचे काम सुरु केले आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र