शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:22 IST

माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन दोन दशके उलटली असली तरी अंमलबजावणीतली पारदर्शकता आणि गती दोन्ही घटताना दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन दोन दशके उलटली असली तरी त्याच्या अंमलबजावणीतली पारदर्शकता आणि गती दोन्ही घटताना दिसत आहेत. देशभरातील केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगांमध्ये आयुक्तांच्या जागा रिक्त असून त्यामुळे चार लाखांहून अधिक अपिले आणि तक्रारींचा निपटारा रखडला आहे.

महाराष्ट्र माहिती आयोग २७ माहिती आयोगांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्र माहिती आयोगाने अपील व तक्रारी सोडविण्यात देशात पहिले स्थान पटकावले आहे. 

३८,४१० प्रकरणे निकाली

१ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्राने ३८,४१० प्रकरणे निकाली काढून सर्वोच्च स्थान पटकावले. उत्तर प्रदेश (३०,५५२) आणि कर्नाटक (२६,८०२) यांचा क्रमांक पुढे लागतो. गेल्या जूनपर्यंत २४ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित होती. यावर रिक्त जागाही परिणाम करतात. 

तेलंगणात २९ वर्षांची प्रतीक्षा 

अहवालानुसार, सध्याची निपटारा गती कायम राहिली तर तेलंगणात २०५४ मध्ये म्हणजे तब्बल २९ वर्षांनंतर एका अपिलाचा निकाल लागू शकतो. त्रिपुरात २३ वर्षे, बिहारात ११, तर मध्य प्रदेश आणि पंजाबात सात वर्षे लागण्याची शक्यता आहे. पारदर्शकता व जबाबदारी या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवरच यामुळे गदा येते.

रिक्त पदांमुळे आयोग ठप्प : केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्त हर्ष संभरिया यांचा कार्यकाळ १३ सप्टेंबरला संपल्यानंतर हे पद रिक्त आहे. दरवर्षी सुमारे ४० लाख आरटीआय अर्ज दाखल होतात, पण त्यातील मोठा हिस्सा अजूनही अपूर्ण आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra tops in RTI, but appeals face huge delays.

Web Summary : Despite Maharashtra leading in RTI appeal resolutions, over four lakh appeals are pending nationwide due to vacant commissioner positions. Some states may take decades to resolve appeals, undermining transparency and accountability. Central Information Commission also faces vacancy.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRight to Information actमाहिती अधिकार