शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बंडखोर आमदारांची पहिली पसंत 'भाजप', 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:37 IST

Maharashtra Political Crisis: खरे तर सध्या भाजप ही बंडखोर आमदारांची पहिली पसंती झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत जवळपास 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यांपैकी ४५ टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आधी कर्नाटकात, नंतर मध्य प्रदेशात आणि आता महाराष्ट्रामध्ये आमदारांच्या बंडखोरीचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेचे मातब्बर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात घडले, तेच महाराष्ट्रात घडले तर उद्धव यांचे सरकारही पडेल.

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. मात्र, एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 287 आमदार आहेत. यामुळे आता सरकार स्थापनेसाठी अथवा टिकवण्यासाठी एकूण 144 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एकूण 153 आमदार आहेत. यांपैकी शिवसेने कडे 55, राष्ट्रवादीकडे 53 तर काँग्रेसचे 44 आमदारांचे बलाबल आहे. पण, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 हून अधिक आमदार असल्याचा मोठा दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर टांगती तलवार दिसत आहे. एकनाथ शिंदे म्हणत असलेले आमदार भाजपच्या बाजूला गेले तर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

बंडखोर आमदारांची पहिली पसंत भाजप -खरे तर सध्या भाजप ही बंडखोर आमदारांची पहिली पसंती झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत जवळपास 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यांपैकी ४५ टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) आहे. यात 2016 ते 2020 या पाच वर्षांच्याकाळात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या आमदारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा एडीआर रिपोर्ट गेल्या वर्षी मार्चमध्ये आला आहे.

बंडखोरीचा सर्वाधिक फायदा भाजपला - मार्च 2021 च्या ADR अहवालामध्ये म्हणण्यात आले आहे,की  आहे की, 2016 ते 2020 दरम्यान देशभरातील विधानसभेतील 405 आमदारांनी पक्ष सोडला. यांपैकी 182 म्हणजेच एकूण 45 टक्के आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. 

या अहवालानुसार, पक्ष सोडून गेलेल्या 38 म्हणजे 9.4% आमदार काँग्रेसशी संबंधित होते. तर, 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये आणि 16 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय, नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये 16, जेडीयूमध्ये 14, तर बसपा आणि टीडीपीमध्ये प्रत्येकी 11 आमदार सामील झाले आहेत.

बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला -बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. पाच वर्षांत काँग्रेसच्या तब्बल 170 आमदारांनी पक्ष सोडला. तर भाजपच्या 18 आमदारांनी पक्ष सोडला आहे. याशिवाय, बसप आणि टीडीपीच्या 17-17 आमदारांनी पक्ष सोडला. महत्वाचे म्हणजे या 5 वर्षांच्या काळात शिवसेनेच्या एकही आमदाराने पक्ष सोडला नव्हता.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकMadhya Pradeshमध्य प्रदेश