शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदारांची पहिली पसंत 'भाजप', 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:37 IST

Maharashtra Political Crisis: खरे तर सध्या भाजप ही बंडखोर आमदारांची पहिली पसंती झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत जवळपास 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यांपैकी ४५ टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आधी कर्नाटकात, नंतर मध्य प्रदेशात आणि आता महाराष्ट्रामध्ये आमदारांच्या बंडखोरीचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेचे मातब्बर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात घडले, तेच महाराष्ट्रात घडले तर उद्धव यांचे सरकारही पडेल.

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. मात्र, एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 287 आमदार आहेत. यामुळे आता सरकार स्थापनेसाठी अथवा टिकवण्यासाठी एकूण 144 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एकूण 153 आमदार आहेत. यांपैकी शिवसेने कडे 55, राष्ट्रवादीकडे 53 तर काँग्रेसचे 44 आमदारांचे बलाबल आहे. पण, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 हून अधिक आमदार असल्याचा मोठा दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर टांगती तलवार दिसत आहे. एकनाथ शिंदे म्हणत असलेले आमदार भाजपच्या बाजूला गेले तर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

बंडखोर आमदारांची पहिली पसंत भाजप -खरे तर सध्या भाजप ही बंडखोर आमदारांची पहिली पसंती झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत जवळपास 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यांपैकी ४५ टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) आहे. यात 2016 ते 2020 या पाच वर्षांच्याकाळात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या आमदारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा एडीआर रिपोर्ट गेल्या वर्षी मार्चमध्ये आला आहे.

बंडखोरीचा सर्वाधिक फायदा भाजपला - मार्च 2021 च्या ADR अहवालामध्ये म्हणण्यात आले आहे,की  आहे की, 2016 ते 2020 दरम्यान देशभरातील विधानसभेतील 405 आमदारांनी पक्ष सोडला. यांपैकी 182 म्हणजेच एकूण 45 टक्के आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. 

या अहवालानुसार, पक्ष सोडून गेलेल्या 38 म्हणजे 9.4% आमदार काँग्रेसशी संबंधित होते. तर, 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये आणि 16 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय, नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये 16, जेडीयूमध्ये 14, तर बसपा आणि टीडीपीमध्ये प्रत्येकी 11 आमदार सामील झाले आहेत.

बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला -बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. पाच वर्षांत काँग्रेसच्या तब्बल 170 आमदारांनी पक्ष सोडला. तर भाजपच्या 18 आमदारांनी पक्ष सोडला आहे. याशिवाय, बसप आणि टीडीपीच्या 17-17 आमदारांनी पक्ष सोडला. महत्वाचे म्हणजे या 5 वर्षांच्या काळात शिवसेनेच्या एकही आमदाराने पक्ष सोडला नव्हता.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकMadhya Pradeshमध्य प्रदेश