शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Government: शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर, खासदारांची जागा विरोधी बाकांवर; भाजपाने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 14:41 IST

लोकसभेत भाजपाला संपूर्ण बहुमत आहे मात्र राज्यसभेत भाजपाला इतर पक्षांची मदतीची गरज असते

दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याने केंद्र सरकारमधून शिवसेना बाहेर पडली आहे. शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलविली होती. मात्र या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसणार आहेत अशी अधिकृत घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. 

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, शिवसेना एनडीए बैठकीत आली नाही, त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत गेली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे असल्याचं त्यांनी सांगितले.  

लोकसभेत भाजपाला संपूर्ण बहुमत आहे मात्र राज्यसभेत भाजपाला इतर पक्षांची मदतीची गरज असते. त्यामुळे शिवसेनेचा विरोध भाजपासाठी कठीण जाणार आहे. सर्वपक्षीय बैठकीसाठी गटनेते विनायक राऊत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या १८ आहे. एनडीएतील दोन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध सरकारसाठी डोकेदुखी ठरु शकतो.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. 

भाजपाने महाराष्ट्रात युती संपल्याची अद्याप घोषणा झाली नाही. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत विरूद्ध भाजपाध्यक्ष अमित शहा अशी जुगलबंदी रंगली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. युती नसली तरी तशी घोषणाही नाही. केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेला रालोआ बैठकीचे निमंत्रण न पाठवून भाजपनेदेखील 'युती तुटली' असाच संदेश दिला होता. मात्र शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागा बदलण्यात आली आहे तसेच याबाबत संसदीय कार्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणाच केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019