शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: '...तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाच काय, १५ वर्षं टिकेल!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 17:52 IST

Maharashtra News : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या भिन्न विचारधारांच्या पक्षांचं सरकार पाच वर्षं टिकेल का अशी शंका अनेकांच्या मनात आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहेआता ते आपल्या मित्रांशी आणि मग शिवसेनेशी अंतिम चर्चा करतील.

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची चिन्हं अखेर दिसू लागली आहेत. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची 'महाविकासआघाडी' राज्यात सरकार स्थापन करेल, हे आता जवळपास निश्चित झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती या दोन्ही पक्षांकडून आज देण्यात आली. त्यानंतर आता ते आपल्या मित्रांशी आणि मग शिवसेनेशी अंतिम चर्चा करतील. हे भिन्न प्रवृत्तीच्या आणि विचारधारांच्या पक्षांचं सरकार पाच वर्षं टिकेल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतानाच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. पाचच काय, हे सरकार १५ वर्षंही टिकू शकतं, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चा फलदायी ठरत असून सकारात्मक दृष्टीने पुढे गेली आहे. उद्या आम्ही आमच्या मित्रपक्षांना भेटू आणि मग आवश्यक आणि उचित पावलं उचलली जातील. काही जणांना या चर्चेच्या फेऱ्या कशासाठी असा प्रश्न पडलाय. पण, जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने ठरलं आणि सरकार भक्कम पायावर उभं राहिलं तर पाचच काय १५ वर्षं टिकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

समन्वय महत्त्वाचा!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता शिवसेना हा नवा मित्र आमच्याशी जोडला जातोय. त्यामुळे समन्वय अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्यादृष्टीने योग्य काळजी घेतली जाईल, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीमधील मंत्री आणि पक्षांचे नेते यांची एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते, असं सूत्रांकडून समजतं. 

किमान समान कार्यक्रमाबद्दल फार काही बोलणं जयंत पाटील यांनी टाळलं. महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करून, सरकार चालवताना महत्त्वाच्या ठरतील अशा गोष्टींचा या किमान समान कार्यक्रमात समावेश असेल. या सर्व गोष्टी सगळ्यांचं ठरल्यावर एकत्रितपणे जाहीर करू, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवं?

शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे फक्त दोनच आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, असा सूर कार्यकर्त्यांमधून आणि काही नेत्यांमधून ऐकू येतोय. मात्र, या विषयालाही जयंत पाटील यांनी बगल दिली. अशा गोष्टींवर आत्ता चर्चा करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेगळी योग्य स्तरावर त्यासंबंधी विचार होईल, असं त्यांनी सूचित केलं. 

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का?

भाजपाला जमेना, महाविकासआघाडीचे काही ठरेना, अखेर राज्यपालांनीचे केले सत्ताधिकारांचे वाटप

अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी!

'महाशिवआघाडी'मधून 'शिव' हटवणाऱ्या सेनेला भाजपानं काढला चिमटा!

...तर भाजपानेच शिवसेनेला पाठिंबा दिला असता: रामदास आठवले 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस