शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

Maharashtra Government: '...तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाच काय, १५ वर्षं टिकेल!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 17:52 IST

Maharashtra News : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या भिन्न विचारधारांच्या पक्षांचं सरकार पाच वर्षं टिकेल का अशी शंका अनेकांच्या मनात आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहेआता ते आपल्या मित्रांशी आणि मग शिवसेनेशी अंतिम चर्चा करतील.

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची चिन्हं अखेर दिसू लागली आहेत. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची 'महाविकासआघाडी' राज्यात सरकार स्थापन करेल, हे आता जवळपास निश्चित झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती या दोन्ही पक्षांकडून आज देण्यात आली. त्यानंतर आता ते आपल्या मित्रांशी आणि मग शिवसेनेशी अंतिम चर्चा करतील. हे भिन्न प्रवृत्तीच्या आणि विचारधारांच्या पक्षांचं सरकार पाच वर्षं टिकेल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतानाच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. पाचच काय, हे सरकार १५ वर्षंही टिकू शकतं, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चा फलदायी ठरत असून सकारात्मक दृष्टीने पुढे गेली आहे. उद्या आम्ही आमच्या मित्रपक्षांना भेटू आणि मग आवश्यक आणि उचित पावलं उचलली जातील. काही जणांना या चर्चेच्या फेऱ्या कशासाठी असा प्रश्न पडलाय. पण, जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने ठरलं आणि सरकार भक्कम पायावर उभं राहिलं तर पाचच काय १५ वर्षं टिकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

समन्वय महत्त्वाचा!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता शिवसेना हा नवा मित्र आमच्याशी जोडला जातोय. त्यामुळे समन्वय अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्यादृष्टीने योग्य काळजी घेतली जाईल, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीमधील मंत्री आणि पक्षांचे नेते यांची एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते, असं सूत्रांकडून समजतं. 

किमान समान कार्यक्रमाबद्दल फार काही बोलणं जयंत पाटील यांनी टाळलं. महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करून, सरकार चालवताना महत्त्वाच्या ठरतील अशा गोष्टींचा या किमान समान कार्यक्रमात समावेश असेल. या सर्व गोष्टी सगळ्यांचं ठरल्यावर एकत्रितपणे जाहीर करू, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवं?

शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे फक्त दोनच आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, असा सूर कार्यकर्त्यांमधून आणि काही नेत्यांमधून ऐकू येतोय. मात्र, या विषयालाही जयंत पाटील यांनी बगल दिली. अशा गोष्टींवर आत्ता चर्चा करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेगळी योग्य स्तरावर त्यासंबंधी विचार होईल, असं त्यांनी सूचित केलं. 

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का?

भाजपाला जमेना, महाविकासआघाडीचे काही ठरेना, अखेर राज्यपालांनीचे केले सत्ताधिकारांचे वाटप

अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी!

'महाशिवआघाडी'मधून 'शिव' हटवणाऱ्या सेनेला भाजपानं काढला चिमटा!

...तर भाजपानेच शिवसेनेला पाठिंबा दिला असता: रामदास आठवले 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस