शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Government: एनडीए सोडल्याचा परिणाम; माजी केंद्रीय मंत्र्यांची रवानगी पहिल्या बाकावरुन थेट 'या' रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 18:08 IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून दिल्लीत सुरु होत आहे. तत्पूर्वी एनडीएची बैठक आज पार पडली.

दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षाचे पडसाद दिल्लीतही उमटत आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची जागा विरोधी बाकांवर केली आहे. केंद्र सरकारमधून शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. तसेच एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नाही. अरविंद सावंत यांचा कारभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून दिल्लीत सुरु होत आहे. तत्पूर्वी एनडीएची बैठक आज पार पडली. गेल्या ३० वर्षापासून न चुकता या बैठकीचं निमंत्रण शिवसेनेला देण्यात येत होतं. मात्र राज्यात शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केल्याचे परिणाम दिल्लीत दिसू लागले आहेत. केंद्र सरकारमधून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरुन शिवसेना खासदारांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे. त्याचसोबत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सावंत यांना आता पहिल्या रांगेतून थेट तिसऱ्या रांगेत बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, शिवसेना एनडीए बैठकीत आली नाही, त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत गेली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे असल्याचं त्यांनी सांगितले.  

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. 

भाजपाने महाराष्ट्रात युती संपल्याची अद्याप घोषणा झाली नाही. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत विरूद्ध भाजपाध्यक्ष अमित शहा अशी जुगलबंदी रंगली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. युती नसली तरी तशी घोषणाही नाही. केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेला रालोआ बैठकीचे निमंत्रण न पाठवून भाजपनेदेखील 'युती तुटली' असाच संदेश दिला होता. मात्र शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागा बदलण्यात आली आहे तसेच याबाबत संसदीय कार्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणाच केली आहे.  

 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार