शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maharashtra Government: हा तर जनादेशाचा विश्वासघात, राज्यातील घडामोडींवर काँग्रेसची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:55 IST

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, या घटनाक्रमावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, या घटनाक्रमावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. लोकांनी दिलेल्या जनादेशाचा हा विश्वासघात असून, हे सरकार बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला समर्थन दिल्यानंतर महिनाभरापासूनचा पेच अखेर समाप्त झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या चर्चेत सहभागी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल म्हणाले की, ज्या प्रकारे घडामोडी रात्री झाल्या त्या लाजिरवाण्या आहेत. मुख्यमंत्र्यांना जेव्हा शपथ दिली गेली तेव्हा ना बँडबाजा होता ना मिरवणूक़काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीट केले आहे की, हा तर जनादेशाचा विश्वासघात आणि लोकशाहीची हत्या आहे. अजित पवार हे घोटाळ्यात सहभागी असल्याच्या मीडिया रिपोर्टलाही त्यांनी टॅग केले आहे. सत्तेची लालसा ही तत्त्व आणि भ्रष्टाचार यांना दूर करते. सुरजेवाला यांनी फडणवीस यांच्या सप्टेंबरमधील टष्ट्वीटचा उल्लेख केला आहे. यात फडणवीस म्हणाले होते की, राष्ट्रवादी कधीही सहयोगी असू शकत नाही. कारण, त्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना सरकार स्थापन करणार : अहमद पटेलदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली ती घटना राज्याच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिली जाईल, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी या घटनाक्रमावर टीका केली आहे. संभाव्य आघाडी सरकार स्थापन करण्यास काँग्रेसने उशीर केल्याचा आरोपही पटेल यांनी फेटाळून लावला. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजपने कोडगेपणाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अर्थात, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आम्ही भाजपचा पराभव करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पटेल यांच्यासोबत सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणूगोपाल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा