शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

Maharashtra CM : अमित शहांचे 'ते' वाक्य होतं राजकीय भूकंपाची चाहुल, आज दिला 'धक्का'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:38 IST

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे.

नवी दिल्ली - शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे शुक्रवारी रात्री राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असतानाच अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरवर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जोरदार धक्का दिला आहे. भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे. या सर्व खेळाचे अर्थातच सुत्रधार होते ते भाजपाध्यक्ष अमित शहा. राज्यातील राजकीय परिस्थितीवर फार भाष्य न करणाऱ्या अमित शहा यांनी अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले. 

दरम्यान,  राज्यातील या घडामोडीनंतर अमित शहा यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला होता. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी "मी शांत बसलोय, म्हणजे काहीच करत नाही आहे? असे उद्धव ठाकरे यांना वाटते का? असे सूचक विधान केले होते. मात्र त्यावेळी या विधानाकडे फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण अमित शाह यांनी कुशल रणनीती आखत हा इशारा खरा करून दाखवला.

सर्व राजकीय अंदाजांना धक्का देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  दरम्यान, या घडामोडींनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार