शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM : अमित शहांचे 'ते' वाक्य होतं राजकीय भूकंपाची चाहुल, आज दिला 'धक्का'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:38 IST

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे.

नवी दिल्ली - शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे शुक्रवारी रात्री राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असतानाच अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरवर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जोरदार धक्का दिला आहे. भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे. या सर्व खेळाचे अर्थातच सुत्रधार होते ते भाजपाध्यक्ष अमित शहा. राज्यातील राजकीय परिस्थितीवर फार भाष्य न करणाऱ्या अमित शहा यांनी अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले. 

दरम्यान,  राज्यातील या घडामोडीनंतर अमित शहा यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला होता. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी "मी शांत बसलोय, म्हणजे काहीच करत नाही आहे? असे उद्धव ठाकरे यांना वाटते का? असे सूचक विधान केले होते. मात्र त्यावेळी या विधानाकडे फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण अमित शाह यांनी कुशल रणनीती आखत हा इशारा खरा करून दाखवला.

सर्व राजकीय अंदाजांना धक्का देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  दरम्यान, या घडामोडींनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार