शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Maharashtra CM : अमित शहांचे 'ते' वाक्य होतं राजकीय भूकंपाची चाहुल, आज दिला 'धक्का'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:38 IST

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे.

नवी दिल्ली - शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे शुक्रवारी रात्री राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असतानाच अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरवर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जोरदार धक्का दिला आहे. भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे. या सर्व खेळाचे अर्थातच सुत्रधार होते ते भाजपाध्यक्ष अमित शहा. राज्यातील राजकीय परिस्थितीवर फार भाष्य न करणाऱ्या अमित शहा यांनी अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले. 

दरम्यान,  राज्यातील या घडामोडीनंतर अमित शहा यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला होता. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी "मी शांत बसलोय, म्हणजे काहीच करत नाही आहे? असे उद्धव ठाकरे यांना वाटते का? असे सूचक विधान केले होते. मात्र त्यावेळी या विधानाकडे फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण अमित शाह यांनी कुशल रणनीती आखत हा इशारा खरा करून दाखवला.

सर्व राजकीय अंदाजांना धक्का देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  दरम्यान, या घडामोडींनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार