शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

महाकुंभ चेंगराचेंगरीत 15000 लोकांचे नातेवाईक बेपत्ता; सपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:32 IST

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत.

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जातोय. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनीदेखील महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत मोठा दावा केला. 

महाकुंभ चेंगराचेंगरीवर संसदेत झालेल्या निदर्शनेनंतर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी दावा केला की, या घटनेनंतर 15,000 लोकांनी त्यांचे कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणतेही अपडेट किंवा माहिती सरकार देत नसल्याबद्दल यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

15,000 बेपत्ता वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सपा खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर 15,000 लोकांनी आपले नातेवाईक बेपत्ता असल्याच्या तक्रारी दिल्या. पण, सरकार याबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार ​​नाही. 1954 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत बोलताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या सांगितली होती.

याउलट उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासन व्हीआयपींसाठी व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. त्यांना सर्वसामान्यांची चिंता अजिबात चिंता नाही. मुख्यमंत्री रोज कुंभमेळ्यात हजर असतात. सर्व अधिकारी व्हीआयपी लेनची देखभाल करण्यात व्यस्त असतात. सर्वसामान्य लोक मरतात, याची त्यांना फिकीर नाही, अशी टीकाही सपा खासदार राम गोपाल यादव यांनी केली. 

विरोधकांची कारवाईची मागणी सोमवारी विरोधकांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उधळून लावले. 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी यूपी सरकारवर टीका केली आणि मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर न केल्याबद्दल सरकारला फटकारले. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) सदस्या सुलता देव यांनीदेखील मृत आणि बेपत्ता भाविकांचा डेटा शोधण्यात सरकारच्या असमर्थतेवर प्रश्न केला. तसेच, या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चेची मागणी केली. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा