शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महाकुंभ चेंगराचेंगरीत 15000 लोकांचे नातेवाईक बेपत्ता; सपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:32 IST

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत.

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जातोय. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनीदेखील महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत मोठा दावा केला. 

महाकुंभ चेंगराचेंगरीवर संसदेत झालेल्या निदर्शनेनंतर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी दावा केला की, या घटनेनंतर 15,000 लोकांनी त्यांचे कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणतेही अपडेट किंवा माहिती सरकार देत नसल्याबद्दल यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

15,000 बेपत्ता वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सपा खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर 15,000 लोकांनी आपले नातेवाईक बेपत्ता असल्याच्या तक्रारी दिल्या. पण, सरकार याबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार ​​नाही. 1954 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत बोलताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या सांगितली होती.

याउलट उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासन व्हीआयपींसाठी व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. त्यांना सर्वसामान्यांची चिंता अजिबात चिंता नाही. मुख्यमंत्री रोज कुंभमेळ्यात हजर असतात. सर्व अधिकारी व्हीआयपी लेनची देखभाल करण्यात व्यस्त असतात. सर्वसामान्य लोक मरतात, याची त्यांना फिकीर नाही, अशी टीकाही सपा खासदार राम गोपाल यादव यांनी केली. 

विरोधकांची कारवाईची मागणी सोमवारी विरोधकांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उधळून लावले. 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी यूपी सरकारवर टीका केली आणि मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर न केल्याबद्दल सरकारला फटकारले. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) सदस्या सुलता देव यांनीदेखील मृत आणि बेपत्ता भाविकांचा डेटा शोधण्यात सरकारच्या असमर्थतेवर प्रश्न केला. तसेच, या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चेची मागणी केली. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा