शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

मुंबई ते प्रयागराज जितका विमान प्रवास दर तितक्या खर्चात परदेशात जाल; DGCA हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:09 IST

महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकिट दर गगनाला भिडलेत.

प्रयागराज - तब्बल १४४ वर्षांनी भरलेल्या महाकुंभ मेळ्यात कोट्यवधीच्या संख्येने भाविक येत आहेत. आतापर्यंत ११ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. देशातच नाही तर परदेशातूनही मोठ्या श्रद्धेने भाविक प्रयागराज इथं येत आहेत. महाकुंभसाठी होणारी गर्दी जशी वाढत आहेत तसा इथे येणारा विमान प्रवासही महागला आहे. दिल्ली अथवा मुंबईतून प्रयागराजला पोहचण्यासाठी विमानाचं तिकिट इतकं महागलं आहे ज्यात तुम्ही सिंगापूर, दुबई, लंडनसारखे देश फिरून याल. प्रयागराजला हवाई प्रवासाने जाण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानाच्या दिवशी फ्लाईट तिकिट सर्वाधिक दराने विकली जात आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकिट दर गगनाला भिडलेत. सामान्य दिवशी दिल्लीतून प्रयागराजला जाण्यासाठी १०-१२ हजार रुपये दर आकारले जातात तर मुंबईतून प्रयागराजला जाण्यासाठी १५ हजारांपर्यंत दर घेतला जातो. परंतु शाही स्नानाच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात जाणाऱ्यांना दिल्लीतून प्रयागराज ५० हजार रुपये आणि मुंबईतून ५०-६० हजार रुपये तिकिट दर आकारले जात आहेत. 

विशेष म्हणजे दिल्ली ते लंडन ३ फेब्रुवारीला विमानाचे तिकिट दर ३०-३५ हजार इतके आहेत. दिल्ली सिंगापूर प्रवासाचा दर २४-२५ हजार रुपये आहे. महाकुंभसाठी विमान तिकिट दरात वाढ पाहून लोकांनी या कंपन्यांवर अंकुश लावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वाढणाऱ्या तिकिट दराकडे लक्ष वेढत सरकारकडे ते कमी करण्याची मागणी केली आहे. प्रयागराजला येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षा, सुविधा यांचं राज्य सरकार लक्ष ठेवत आहे परंतु काही विमान कंपन्या यातून संधी शोधत दरात वाढ करत आहेत ते अयोग्य असल्याचं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं.

दरम्यान, महाकुंभसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातायेत, त्यात प्रवाशांसाठी सुविधेसह तिकिट दर मर्यादित ठेवले आहेत. विमान कंपन्यांनी इकोनॉमी क्लाससाठी २०० ते ७०० टक्के तिकिट दरात वाढ केलेत. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या मागणीकडे लक्ष देत विमान वाहतूक नियामक(DGCA) अलर्ट झालं आहे. महाकुंभसाठी प्रयागराजला येणाऱ्या विमान तिकिट दरावर विचार करावा असं त्यांनी सांगितले. तसेच भाविकांची वाढती मागणी पाहून ८१ अतिरिक्त उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे.   

टॅग्स :airplaneविमानUttar Pradeshउत्तर प्रदेश