शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते प्रयागराज जितका विमान प्रवास दर तितक्या खर्चात परदेशात जाल; DGCA हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:09 IST

महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकिट दर गगनाला भिडलेत.

प्रयागराज - तब्बल १४४ वर्षांनी भरलेल्या महाकुंभ मेळ्यात कोट्यवधीच्या संख्येने भाविक येत आहेत. आतापर्यंत ११ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. देशातच नाही तर परदेशातूनही मोठ्या श्रद्धेने भाविक प्रयागराज इथं येत आहेत. महाकुंभसाठी होणारी गर्दी जशी वाढत आहेत तसा इथे येणारा विमान प्रवासही महागला आहे. दिल्ली अथवा मुंबईतून प्रयागराजला पोहचण्यासाठी विमानाचं तिकिट इतकं महागलं आहे ज्यात तुम्ही सिंगापूर, दुबई, लंडनसारखे देश फिरून याल. प्रयागराजला हवाई प्रवासाने जाण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानाच्या दिवशी फ्लाईट तिकिट सर्वाधिक दराने विकली जात आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकिट दर गगनाला भिडलेत. सामान्य दिवशी दिल्लीतून प्रयागराजला जाण्यासाठी १०-१२ हजार रुपये दर आकारले जातात तर मुंबईतून प्रयागराजला जाण्यासाठी १५ हजारांपर्यंत दर घेतला जातो. परंतु शाही स्नानाच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात जाणाऱ्यांना दिल्लीतून प्रयागराज ५० हजार रुपये आणि मुंबईतून ५०-६० हजार रुपये तिकिट दर आकारले जात आहेत. 

विशेष म्हणजे दिल्ली ते लंडन ३ फेब्रुवारीला विमानाचे तिकिट दर ३०-३५ हजार इतके आहेत. दिल्ली सिंगापूर प्रवासाचा दर २४-२५ हजार रुपये आहे. महाकुंभसाठी विमान तिकिट दरात वाढ पाहून लोकांनी या कंपन्यांवर अंकुश लावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वाढणाऱ्या तिकिट दराकडे लक्ष वेढत सरकारकडे ते कमी करण्याची मागणी केली आहे. प्रयागराजला येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षा, सुविधा यांचं राज्य सरकार लक्ष ठेवत आहे परंतु काही विमान कंपन्या यातून संधी शोधत दरात वाढ करत आहेत ते अयोग्य असल्याचं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं.

दरम्यान, महाकुंभसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातायेत, त्यात प्रवाशांसाठी सुविधेसह तिकिट दर मर्यादित ठेवले आहेत. विमान कंपन्यांनी इकोनॉमी क्लाससाठी २०० ते ७०० टक्के तिकिट दरात वाढ केलेत. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या मागणीकडे लक्ष देत विमान वाहतूक नियामक(DGCA) अलर्ट झालं आहे. महाकुंभसाठी प्रयागराजला येणाऱ्या विमान तिकिट दरावर विचार करावा असं त्यांनी सांगितले. तसेच भाविकांची वाढती मागणी पाहून ८१ अतिरिक्त उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे.   

टॅग्स :airplaneविमानUttar Pradeshउत्तर प्रदेश