शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा दिग्गींना दे धक्का; 25 वर्षांपूर्वीच्या 'त्या' बंडाचा काढला वचपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 18:07 IST

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते.

भोपाळ/नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधलंकाँग्रेस सरकार कोसळ्याण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा सोपवला आहे. यानंतर मध्य प्रदेशातल्या 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे. 

आज सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. कोरोनामुळे होळी खेळणार नसल्याचं जाहीर करणाऱ्या मोदी यांनी मध्य प्रदेशात राजकीय भूकंप घडवत पॉलिटिकल होळी साजरी केल्याचं बोललं जात आहे. मोदी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का देत 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

1995 मध्ये गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. पहिल्यांदाच राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. 182 सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121  उमेदवार निवडून गेले. या निवडणुकीची रणनीती नरेंद्र मोदींनी आखली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्रदीपक यशात त्यांचा मोठा वाटा होता. मोदींच्या अचूक रणनीतीला शंकरसिंह वाघेला यांच्या आक्रमकतेची आणि केशुभाई पटेल यांच्या लोकप्रियतेची साथ मिळाली.

भाजपमधलं सर्वात मोठं बंड

केशुभाई पटेल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर भाजपमध्ये सर्वात मोठं बंड झालं. पटेल यांनी मुख्यमंत्री केल्याने वाघेला नाराज झाले आणि पक्षाच्या 45 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन मध्य प्रदेशातल्या खजुराहोमध्ये गेले. या आमदारांना त्यावेळी खजुरियाज म्हटलं गेलं. तर भाजपसोबत राहिलेल्या आमदारांना हजुरियाज (एकनिष्ठ) म्हटलं गेलं. 

दिग्विजय सिंह यांची भूमिका काय?

शंकरसिंह वाघेला 45 पेक्षा अधिक आमदारांसह मध्य प्रदेशातल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं. दिग्विजय सिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते. भाजपने वाघेला यांचं बंड मोडून काढू नये, भाजप आमदारांची घरवापसी होऊ नये म्हणून सिंह यांनी प्रयत्न केले होते, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. 

भाजप सरकार कोसळलं; वाघेला मुख्यमंत्री

वाघेला यांनी 45 पेक्षा अधिक आमदारांसह बंड केल्याने भाजप सरकार कोसळलं. काँग्रेसच्या पाठिंब्याने वाघेला मुख्यमंत्री झाले. जवळपास 2 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले.

25 वर्षानंतर मोदींनी काढला वचपा?

25 वर्षांपूर्वी भाजपने गुजरातमध्ये मिळवलेल्या यशात मोदींचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र वाघेला यांच्यामुळे भाजपला पाच वर्षे सरकार चालवता आलं नाही. काँग्रेसमुळे आणि विशेषतः दिग्विजय सिंह यांच्यामुळे त्यावेळी गुजरातमधलं भाजप सरकार कोसळलं होतं. आता दिग्विजय सिंह यांच्याच मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे काठवरचं बहुमत असताना सत्ता स्थापन करण्यात दिग्विजय यांचा मोठा वाटा होता. 

दिग्विजय यांच्या राजकारणामुळेच सिंधिया पक्षापासून दूर गेल्याचं बोललं जातं. आज सकाळी सिंधिया यांनी मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार मोठ्या अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे मोदींनी 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शहाMadhya Pradeshमध्य प्रदेशDigvijaya Singhदिग्विजय सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी