शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ; मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचा फार्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 2:56 PM

मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलीसरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकरी त्रस्तकाही शेतकऱ्यांना मिळाली किरकोळ कर्जमाफी

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती. आता सरकारने आणलेल्या जय किसान कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकरी अर्ज भरत आहेत. मात्र या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लावण्यात आल्या आहेत. त्यावरून शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावासमोर 30 रुपये तर काहींच्या नावासमोर वालासमोर 100 रुपये माफ झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, सरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने कर्जमाफी झालेल्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. निपानीया येथील शिवलाल आणि शिवनारायण हे दोन शेतकरी आपली बँक पासबूक घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांवर 20 हजार पेक्षा अधिक कर्ज आहे. मात्र त्यांचे केवळ 13 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. जर सरकार कर्ज माफ करत असेल तर पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, 13 रुपये 5 रुपये एवढ्या पैशांची तर आम्ही विडी पितो, अशा शब्दात या शेतकऱ्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. मध्य प्रदेशमधील खरगौन येथील शेतकरीसुद्धा या किरकोळ कर्जमाफीमुळे त्रस्त आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांचे 25, 50, 150, 180 आणि 300 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. मुख्यमंत्री कमनलाथ यांच्या छिंडवाडा मतदारसंघातील हमीद खाँ यांच्या नावावर दहा हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र त्यापैकी केवळ 232 रुपयांचे कर्जमाफ झाले आहे. तर माळवा येथील नारायण सिंह यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण पण त्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, बँकांकडे हिंदी सॉफ्टवेअर नसल्याने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीतून प्रसिद्ध केली, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. कर्जामाफीच्या या गोंधळावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत आहे. याचे परिणाम कांग्रेसला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असे भाजपाने म्हटले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस