शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'इंडियन कोरोना म्हणणं पडलं महागात', कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर; भाजपाने केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:34 IST

Case Registered Against Congress Kamalnath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,67,52,447 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,03,720  लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इंडियन कोरोना म्हणणं त्यांना आता महागात पडलं आहे. 

कमलनाथ यांच्यावर खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. आता कोरोनाला जगात इंडियन कोरोना नावाने ओळखले जाईल असं म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपार्ह असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपाने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 

कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. जानेवारी 2020मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला चायनीज कोरोना म्हटलं गेलं. चीनच्या लॅबमध्ये हा कोरोना तयार झाला आणि एका शहरातून हा कोरोना आला. आज आपण कुठे पोहोचलो आहोत? इंडियन कोरोना येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणं टाळलं आहे. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक इंडियन कोरोना घेऊन येतील म्हणून त्यांना तिथेच रोखून ठेवलं आहे. जगभरात देश यामुळे ओळखला जात आहे. आता आपला देश महान राहिला नाही. आता भारत कोविडचा बनलेला आहे असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. 

कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस'?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती

कोरोना व्हायरसविरोधातील लस किती प्रभावी आहे? हा तपास करण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) माहिती गोळा करण्यात येत आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरंच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण सक्रीय आहेत? तसेच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि कोरोना संसर्ग रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल असण्याचा कालावधीसंबंधी माहिती आयसीएमआरने मागितली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी