शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:38 IST

१० मतदारसंघांमध्ये जय-पराजयात एक हजारापेक्षा कमी मतांचा फरक

- अमोल मचाले पुणे : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ११४, तर भाजपाने १०९ जागा जिंकल्या. यापैकी १० मतदारसंघांमध्ये विजयी आणि पराभूत उमेदवारांत एक हजारापेक्षा कमी मतांचे अंतर होते. या १० ठिकाणी दोन्ही प्रमुख पक्षांना मिळालेली मते पाहता भाजपानेमध्य प्रदेशातील सत्ता अवघ्या साडेचार हजार मतांनी गमावल्याचे, तर काँग्रेसचे बहुमत फक्त २ हजार मतांनी हुकल्याचे दिसते.या १० पैकी ७ ठिकाणी भाजपा उमेदवारांना पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजपासाठी धक्कादायक बाब म्हणजे, या सातही मतदारसंघांत मिळून विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक अवघ्या ४ हजार ३३७ मतांचा आहे. म्हणजे, या ठिकाणी सुमारे साडेचार हजारांच्या घरात मते भाजपाला मिळाली असती तर, या पक्षाला १०९ ऐवजी ११६ जागा म्हणजे काठावरचे बहुमत मिळून शिवराजसिंह यांनी विजयाचा चौकार लगावला असता.दुसरीकडे, १० पैकी ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार भाजपा उमेवारांकडून एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. त्याचा एकूण फरक १ हजार ८६३ मतांचा आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून काँग्रेस उमेवारांनी सुमारे २ हजार मते जादा घेतली असती तर त्यांच्या जागा ११४ वरून ११७ वर गेल्या असत्या. म्हणजे, या पक्षाने बहुमताला आवश्यक ११६ पेक्षा एक जागा जास्त जिंकली असती. मात्र, येथे दोन हजार मते कमी मिळाल्याने काँग्रेसचे बहुमत हुकले.दोन्ही पक्षांना ‘नोटा’चा फटकाज्या ७ ठिकाणी भाजपा उमेदवार एका हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा किती तरी जास्त मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला.सातही ठिकाणी मिळून भाजपा उमेदवारांच्या पराभवाच्या अंतराची बेरीज ४,३३७ असताना तेथे तब्बल १४,३५८ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.काँग्रेसलाही ‘नोटा’चा फटका बसला. ज्या ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले (एकूण बेरीज १८३३ मते), तेथे ४,७१२ मतदारांना विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करावे, इतपत पात्र उमेदवार कोणीच न वाटल्याने त्यांनी ‘नोटा’ला पसंती दिली.म्हणजेच, ज्या १० ठिकाणी एक हजारापेक्षा कमी मतांनी निकाल लागला तेथे ६,२०० मते निर्णायक ठरली. या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १९,०७० मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले....तर ‘टाय’ झाला असता१० मतदारसंघांतील जय-पराजयाचे अंतर बघता गमावलेल्या ७ ठिकाणी मिळून भाजपाने सुमारे साडेचार हजार मते घेतली असती आणि दुसरीकडे पराभूत झालेल्या ३ ठिकाणी मिळून काँग्रेसने सुमारे २ हजार मते घेतली असती, तर भाजपाने ११३ आणि काँग्रेसने ११० जागा जिंकल्या असत्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, असे निवडणुकीआधीच जाहीर करणाऱ्या बसपा (२) आणि सपा (१) यांनी काँग्रेसला साथ दिली असती तर ही निवडणूक टाय (प्रत्येकी ११३ जागा) झाली असती.२०१३पेक्षा भाजपाचा ‘वोट शेअर’ ३.८७ टक्क्यांनी घसरला२०१३ मध्ये भाजपाने शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली होती. तेव्हा भाजपाने एकूण मतदानाच्या ४४.८७ टक्के मतांसह तब्बल १६५ जागा जिंकल्या होत्या. ३६.३८ टक्के मते आणि जागा मात्र ५८ अशी निराशाजनक कामगिरी काँग्रेसने केली होती. २०१३च्या तुलनेत यंदा भाजपाला ४१ टक्के म्हणजे ३.८७ टक्के मते कमी मिळाली. जागा मात्र ५६ ने घटल्या. दुसरीकडे, २०१३ पेक्षा यंदा काँग्रेसने ४०.९ म्हणजे ४.५२ टक्के मते जादा घेतली. त्यांच्या जागांत ५६ने वाढ होऊन हा पक्ष सत्तेवर आला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा