शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:38 IST

१० मतदारसंघांमध्ये जय-पराजयात एक हजारापेक्षा कमी मतांचा फरक

- अमोल मचाले पुणे : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ११४, तर भाजपाने १०९ जागा जिंकल्या. यापैकी १० मतदारसंघांमध्ये विजयी आणि पराभूत उमेदवारांत एक हजारापेक्षा कमी मतांचे अंतर होते. या १० ठिकाणी दोन्ही प्रमुख पक्षांना मिळालेली मते पाहता भाजपानेमध्य प्रदेशातील सत्ता अवघ्या साडेचार हजार मतांनी गमावल्याचे, तर काँग्रेसचे बहुमत फक्त २ हजार मतांनी हुकल्याचे दिसते.या १० पैकी ७ ठिकाणी भाजपा उमेदवारांना पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजपासाठी धक्कादायक बाब म्हणजे, या सातही मतदारसंघांत मिळून विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक अवघ्या ४ हजार ३३७ मतांचा आहे. म्हणजे, या ठिकाणी सुमारे साडेचार हजारांच्या घरात मते भाजपाला मिळाली असती तर, या पक्षाला १०९ ऐवजी ११६ जागा म्हणजे काठावरचे बहुमत मिळून शिवराजसिंह यांनी विजयाचा चौकार लगावला असता.दुसरीकडे, १० पैकी ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार भाजपा उमेवारांकडून एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. त्याचा एकूण फरक १ हजार ८६३ मतांचा आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून काँग्रेस उमेवारांनी सुमारे २ हजार मते जादा घेतली असती तर त्यांच्या जागा ११४ वरून ११७ वर गेल्या असत्या. म्हणजे, या पक्षाने बहुमताला आवश्यक ११६ पेक्षा एक जागा जास्त जिंकली असती. मात्र, येथे दोन हजार मते कमी मिळाल्याने काँग्रेसचे बहुमत हुकले.दोन्ही पक्षांना ‘नोटा’चा फटकाज्या ७ ठिकाणी भाजपा उमेदवार एका हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा किती तरी जास्त मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला.सातही ठिकाणी मिळून भाजपा उमेदवारांच्या पराभवाच्या अंतराची बेरीज ४,३३७ असताना तेथे तब्बल १४,३५८ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.काँग्रेसलाही ‘नोटा’चा फटका बसला. ज्या ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले (एकूण बेरीज १८३३ मते), तेथे ४,७१२ मतदारांना विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करावे, इतपत पात्र उमेदवार कोणीच न वाटल्याने त्यांनी ‘नोटा’ला पसंती दिली.म्हणजेच, ज्या १० ठिकाणी एक हजारापेक्षा कमी मतांनी निकाल लागला तेथे ६,२०० मते निर्णायक ठरली. या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १९,०७० मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले....तर ‘टाय’ झाला असता१० मतदारसंघांतील जय-पराजयाचे अंतर बघता गमावलेल्या ७ ठिकाणी मिळून भाजपाने सुमारे साडेचार हजार मते घेतली असती आणि दुसरीकडे पराभूत झालेल्या ३ ठिकाणी मिळून काँग्रेसने सुमारे २ हजार मते घेतली असती, तर भाजपाने ११३ आणि काँग्रेसने ११० जागा जिंकल्या असत्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, असे निवडणुकीआधीच जाहीर करणाऱ्या बसपा (२) आणि सपा (१) यांनी काँग्रेसला साथ दिली असती तर ही निवडणूक टाय (प्रत्येकी ११३ जागा) झाली असती.२०१३पेक्षा भाजपाचा ‘वोट शेअर’ ३.८७ टक्क्यांनी घसरला२०१३ मध्ये भाजपाने शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली होती. तेव्हा भाजपाने एकूण मतदानाच्या ४४.८७ टक्के मतांसह तब्बल १६५ जागा जिंकल्या होत्या. ३६.३८ टक्के मते आणि जागा मात्र ५८ अशी निराशाजनक कामगिरी काँग्रेसने केली होती. २०१३च्या तुलनेत यंदा भाजपाला ४१ टक्के म्हणजे ३.८७ टक्के मते कमी मिळाली. जागा मात्र ५६ ने घटल्या. दुसरीकडे, २०१३ पेक्षा यंदा काँग्रेसने ४०.९ म्हणजे ४.५२ टक्के मते जादा घेतली. त्यांच्या जागांत ५६ने वाढ होऊन हा पक्ष सत्तेवर आला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा