अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:34 IST2025-06-07T17:34:13+5:302025-06-07T17:34:54+5:30
कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता.

अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील माहुली पोलीस स्टेशन परिसरातील हरिहरपूर नगर पंचायत क्षेत्रात दिराचं आणि वहिनीचं लग्न झाल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाला गावकरी उपस्थित होते. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हरिहरपूर परिसरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. याच दरम्यान, खुशबूची तिचा दीर अमितशी जवळीक वाढू लागली. कुटुंबाला हे कळताच दोघेही घर सोडून पळून गेले.
कुटुंबाने कसं तरी दोघांनाही शोधून काढलं. दोघेही एकमेकांसोबत राहण्यावरच ठाम होते. हे प्रकरण हरिहरपूर नगर पंचायतीचे अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही उर्फ पप्पू शाही यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी चर्चेद्वारे प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा दोघांनीही ऐकलं नाही तेव्हा कुटुंबांच्या संमतीने त्यांचं लग्न गावकऱ्यांसमोरच लावण्यात आलं.
लग्नामुळे पती खूपच नाराज झाला आहे. तो कामानिमित्त मुंबईला गेल्यावर खुशबू दिराच्या प्रेमात पडली. त्याने सांगितलं की, या लग्नाशी त्याचा काहीही संबंध नाही. लग्नादरम्यान दोन्ही कुटुंबांसह नगरसेवक आणि अध्यक्ष पप्पू शाही देखील उपस्थित होते. आता या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.