शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

केवळ 250 रुपयांमुळे मुख्यमंत्रीपद गमावलं, मिश्रांचं राजकीय आयुष्यच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 9:02 AM

दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देमध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेशचंद्र सिंह यांनी 25 मार्च 1969 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, आता द्वारका प्रसाद मिश्रा हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळीकडे पसरली.

भोपाळ - डीपी मिश्रा म्हणजे द्वारका प्रसाद मिश्रा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठं नाव. मध्य प्रदेशच्यामुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही मिश्र यांनी सांभाळली होती. मात्र, केवळ 249. रुपये 72 पैशांसाठी त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं होतं. वासुदेव चंद्राकर यांच्या जीवनी नामक पुस्तकात यासंदर्भातील किस्सा सांगण्यात आला आहे. रामप्यारा पारकर, आगासदिया आणि डॉ. परदेशीराम वर्मा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. 

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेशचंद्र सिंह यांनी 25 मार्च 1969 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, आता द्वारका प्रसाद मिश्रा हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळीकडे पसरली. कारण, काँग्रेसचे संपूर्ण नियंत्रण मिश्रा यांच्याकडेच होते. नरेंशचंद्र सिंह हे मध्य प्रदेशचे सर्वात पहिले आणि एकमवेत आदिवासी मुख्यमंत्री होते, जे केवळ 13 दिवसच या पदावर राहिले. सिंह यांनी 14 व्या दिवशी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् त्यानंतर एकप्रकारे सन्यासच घेतला. 

दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे, ही निवडणूक अवैध घोषित करण्यात आली. कमलनारायण यांनी डीपी मिश्रा यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळाला होता. डिपी मिश्रा यांच्या निवडणुकांचे एंजट हे श्यामशरण शुक्ल हे होते. मिश्रा यांनी निवडणूक जिकंली, पण त्यांच्या निवडणूक खर्चाची काही बिले गहाळ झाली होती. 

कमलनारायण शर्मा यांनी या निवणुकीविरुद्ध याचिका दाखल केली. त्यावेळी, शर्मा यांना 6300 रुपयाचे एक बिल मिळाले होते, ज्यावर एजंट श्यामशरण शुक्ल यांचे हस्ताक्षर होते. विशेष म्हणजे शुक्ल यांनीची शर्मा यांना हा महत्त्वाचा ऐवज दिल्याचेही सांगण्यात येते. न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्दबातल ठरवली. कारण, द्वारका प्रसाद मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे दाखवलेल्या खर्चापेक्षा 249 रुपये 72 पैसे अधिक खर्च केले होते. जबलपूर उच्च न्यायालयाने डीपी मिश्रा यांना पुढील 6 वर्षांसाठी निवडणुकांसाठी अपात्र ठरवले. कोर्टाच्या या निर्णयाने डीपी मिश्रा यांचे राजकीय आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर, ते इंदिरा गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत राहिले.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री