शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 1:49 PM

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही.

LokSabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधआरी भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. याच दिशेने काँग्रेस एक-एक पक्षाला सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यात काँग्रेसला यश आले, पण त्यांच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे.

पश्चिम बंगालमध्ये वाद...पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे मन वळवण्यात काँग्रेसला यश आले नाही. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये TMC प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता, त्यामुळए काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. असे मानले जाते की, काँग्रेसने टीएमसीकडे सुमारे 10 जागा मागितल्या होत्या, परंतु ममता फक्त दोन जागा देण्यास तयार आहेत. अद्याप जागांबाबत एकमत झालेले नाही. अधीर रंजन सातत्याने टीएमसीवर निशाणा साधत आहेत, त्यामुळेही जागावाटपाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. या वादामुळे ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला हजेरी लावली नव्हती. अशातच काँग्रेस ममता बॅनर्जींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

महाराष्ट्राची काय आहे परिस्थिती..?महाराष्ट्रातही महाविकासआघाडीने अद्याप जागावाटपाचा आराखडा जाहीर केलेला नाही. काँग्रेस, शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागांच्या गोंधळावर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली असून, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभेच्या सहापैकी तीन जागांवर काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे, तर उद्धव ठाकरेंना मुंबईसह लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवायची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय होणऊ शकतो. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे