शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 07:29 IST

दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढविण्यासाठी भाजप नेत्यांवर सोपविली जबाबदारी

संजय शर्मानवी दिल्ली : पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाची दखल घेत भाजपने प्रचाराच्या रणनीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांवर भर देत प्रचार अधिक धारदार व प्रभावी करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५ ते १०% मतदान वाढवण्यासाठी  कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

पहिल्या टप्प्यात  ६३ टक्क्यांहून कमी मतदान झाल्याने गृहमंत्री अमित शाह,  राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व वरिष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व राज्यांतील परिस्थितींचा आढावा घेण्यात आला. 

सत्तेत येण्यासाठी हवे ६६ टक्के मतदान २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला तेव्हा ६६ टक्के मतदान झाले होते आणि भाजपने २८४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्तेत परतला तेव्हा ६७.४० टक्के मतदान झाले आणि भाजपने ३०३ जागा जिंकल्या. म्हणजे किमान ६६ टक्के मतदान झाल्यास, भाजपचे सरकार स्थापन होते. 

पहिल्या फेरीत केवळ ६३ टक्के मतदान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चिंतेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश देण्याचे भाजप नेत्यांना सांगितले आहे. तसेच लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यास कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

बूथस्तरावर मतदान वाढवा

भाजप नेत्यांच्या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी सर्व नेत्यांना कठोर शब्दांत इशारा दिला की, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करा. त्यासाठी प्रत्येक बूथवर पाच ते दहा टक्के मतदान वाढवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पुढील सव्वा महिना सर्वांनाच युद्धस्तरावर काम करावे लागेल. भाजपचे सर्व नेते, राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांच्यावर मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

जिल्हास्तरावर वॉररूम भाजप नेत्यांच्या बैठकीत निवडणूक प्रचाराचाही आढावा घेण्यात आला. निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांचा फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे आता भाजप स्थानिक प्रश्नही निवडणुकीत मांडणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मुद्दे निश्चित करणे आणि विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाVotingमतदानbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४