शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:33 PM

तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते.

नवी दिल्लीः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला धडा शिकवणारा आहे, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, हे निकाल म्हणजे भाजपाचा मोठा पराभव आहे, हे मानायलाच भाजपाचे नेते तयार नसल्याचे संकेत आज मिळाले. 'लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड' सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांचा खेळ करून पराभवाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते. आमचा पराभव झाला हे मान्य, पण राजस्थानमध्ये तर दर पाच वर्षांनी सरकारं बदलतातच. यावेळी भाजपा आणि काँग्रेसमध्ये फक्त ०.५ टक्के मतांचा फरक आहे. जो जिता वही सिकंदर, पण भाजपाला नाकारलं असं म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी यांनी केला. त्यावेळी मुलाखतकार, इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी छत्तीसगडमधील पराभवाकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्यावर, आम्ही आत्मपरीक्षण करू, असं फडणवीस म्हणाले. काँग्रेसमुक्त भारत याचा अर्थ काँग्रेस पक्षापासून मुक्ती असा नाही, तर काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रवृत्तीपासून मुक्तता असा होता, असंही त्यांनी सांगितलं. 

गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटरीवरून उतरलेली गाडी पटरीवर आणली आहे आता ती वेगाने पुढे जाईल, असं सांगत लोकसभेत पुन्हा मोदी सरकारच येईल, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. नोटाबंदी, जीएसटीनंतर ११ राज्यांतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कितीतरी निवडणुका भाजपाने जिंकल्यात. त्यामुळे एक निवडणूक हरल्यावर, आम्ही पुन्हा निवडूनच येणार नाही, असा गोंधळ करणं बरोबर नाही, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांचेही कान खेचले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNew Delhiनवी दिल्लीLokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८