शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पाडला बांगलादेशचा बुक्का! ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
4
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
5
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
6
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
7
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
8
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
9
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
10
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
11
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
12
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
13
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
14
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
15
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
16
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
17
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
18
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
19
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
20
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."

‘एनआरसी’वर चर्चा न करता लोकसभा तहकूब; अवघ्या काही मिनिटांतच कामकाज गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 05:46 IST

सोमवारी सकाळी बरोबर अकरा वाजता लोकसभेची बैठक सुरू होताच अभूतपूर्व घडले.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : सोमवारी सकाळी बरोबर अकरा वाजता लोकसभेची बैठक सुरू होताच अभूतपूर्व घडले. विरोधी पक्ष सत्तारूढ भाजप खासदारांच्या वादग्रस्त विधानांचा जोरदार निषेध करीत होते; तथापि, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या निषेधाकडे दुर्लक्ष करीत प्रश्नोत्तराला सुरुवात केली; परंतु विरोधी पक्षाचे सदस्य नमते घ्यायला तयार नव्हते. राष्ट्रीय नागरिक नोंदणीशी (एनआरसी) संबंधित प्रश्न मांडण्याआधीच अध्यक्षांनी पापण्यांची उघडझाप होण्याआधीच लोकसभेचे कामकाज तहकूब केले.

यावेळी सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्या रांगेत बसले होते, तर प्रश्न मांडणारे टीआरएसचे एन. नागेश्वर राव हेही सभागृहात उपस्थित होते. तथापि, अशा पद्धतीने सभागृहाचे कामकाज कधीच तहकूब करण्यात आले नसल्याने आजचा प्रकार दुर्मिळच होता.बहुमत आणि विरोधकांचा आवाज क्षीण असल्याने सत्तारूढ पक्ष वाटेल त्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालवीत असल्याने प्रत्येक जण आश्चर्यचकित आहे; परंतु सोमवारी अध्यक्षांनी मिनिटभरात सभागृह तहकूब करण्याचे कारण काय? शाहीनबाग आदी राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित असल्याने एनआरसीच्या मुद्यावर अमित शहा यांना आणखी कोणतीही चर्चा करायची नाही. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, तूर्त देशव्यापी एनआरसी आणण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.

दिल्लीतील निवडणुकांमुळे चर्चा करण्यास सरकार इच्छुक नाही

विरोधकांच्या निषेधामुळे नव्हे, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू असताना सरकारला एनआरसीवर लोकसभेत चर्चा करण्याची इच्छा नव्हती. सत्तारूढ भाजपला एनआरसीच्या मुद्यावरून आणखी वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळे गोंधळ चालू देत सभागृह तहकूब केले.

विशेष म्हणजे सभागृहाच्या पटलावर लिखित उत्तर मांडण्यात आले. त्यात असे म्हटले होते की, राष्ट्रीयस्तरावर तूर्त सरकारने राष्ट्रीय नागरिक नोंदणी तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पंधराएक दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एनआरसीबाबत म्हटले होते की, सरकारने यावर संसदेतही चर्चा केलेली नाही. तेव्हा एनआरसी कशी? एनआरसी आणण्याचा प्रश्न येतोच कुठे? पंतप्रधानांच्या विधानाला अनुसरूनच सभागृहात मांडलेले लेखी उत्तर आहे.

तथापि, गृहमंत्री अमित शहा यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांत देशभरात एनआरसी होईल, असे म्हटले होते.

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीBJPभाजपाdelhiदिल्लीcongressकाँग्रेसIndiaभारत