शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:29 IST

loksabha Election - लोकसभा निवडणुकीत आता शेवटचे २ टप्पे उरले आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील जागांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात यंदा कोण बाजी मारणार यावर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

लखनौ - दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. यामागचं मुख्य कारण म्हणजे देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघात या राज्यात आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत हे नेते यूपीतून विजयी होत देशाचे पंतप्रधान बनले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वातील इंडिया आघाडीनं उत्तर प्रदेशात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यूपीमध्ये यंदा काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशात २५ हून अधिक अशा जागा आहेत ज्यावर देशाची सत्ता अवलंबून आहे. या जागांवर काही उलटफेर झाला तर २०२४ च्या निवडणुकीतील भाजपाचं राजकीय गणित बिघडू शकतं. उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३१ जागा अशा आहेत जिथं २०१९ च्या निवडणुकीत विजय आणि पराभव यांच्यातील अंतर १ लाख अथवा त्याहून कमी मतांचं आहे. या जागा इकडे तिकडे गेल्या तर गणित बिघडेल कारण लोकसभा निवडणुकीत १ लाखाहून कमी मताधिक्य जास्त नसते. यूपीत सध्या इंडियाविरुद्ध एनडी आणि मायावती यांची बसपा अशी तिरंगी लढत दिसतेय. 

२०१९ च्या यूपीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ६४ जागा जिंकल्या होत्या तर सपा ५, बसपा १० आणि काँग्रेसनं १ जागेवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीचं विश्लेषण केले तर ३१ जागांवरील अंतर १ लाख आणि त्याहून कमी होते. या ३१ जागांपैकी २२ जागांवर भाजपाचा कब्जा आहे. तर ६ जागा बसपा, २ सपा आणि एक जागा अपना दलनं जिंकली होती. जर या जागांवरील मतदारांनी बदलाची भूमिका निभावली तर भाजपासाठी सर्वात जास्त अडचण निर्माण होऊ शकते आणि मायावती यांच्यासाठीही टेन्शनचं ठरू शकते. 

मागील लोकसभा निवडणुकीत कमी मताधिक्या असलेल्या ४ जागा अशा आहेत जिथेत १० हजारांहून कमी अंतर पहिल्या २ उमेदवारांमध्ये आहे. ज्यातील २ जागा ५ हजारांपेक्षा कमी मताधिक्य आहे. त्याशिवाय ५ जागा ज्यावर मताधिक्य १० ते २० हजारांमध्ये आहे. लोकसभेच्या ७ जागा अशा ज्यात मताधिक्य २० ते ५० हजारांमध्ये आहे. त्याशिवाय १५ जागांवर मताधिक्य ५० हजार ते १ लाखांपर्यंत आहे. 

सपा-काँग्रेस भाजपाचा खेळ बिघडवणार?

मोदी लाटेवर स्वार भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा आघाडी असूनही भाजपाला ६२ जागांवर विजय मिळाला होता. दोन्ही निवडणुकीत भाजपानं त्यांच्या मित्रपक्षाला २-२ जागा दिल्या होत्या. मागील २ निवडणुकीत विरोधी पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. परंतु यंदा काँग्रेस आणि समाजवादी पक्ष रिंगणात उतरला आहे. अखिलेश यादवनं मुस्लीम-यादव समीकरण पुढे आणलं आहे. इतकेच नाही तर निवडणुकीत गैरयादव ओबीसीवर सपा-काँग्रेसची नजर आहे. ज्यातून भाजपाच्या पारंपारिक मतांमध्ये फूट पडली जाईल असा डाव आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला किती जागा मिळतात त्यावर त्यांच्या अबकी बार ४०० पारचं भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावती