शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

'लोकसभा निकालानंतर मोदी-नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लुप्त होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:18 IST

बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून तेजस्वी यादव सध्या मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

नवी दिल्ली - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार असून निकालानंतर देशात राजकीय भूकंप होणार आहे. या राजकीय भूकंपानंतर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लूप्त होतील, असा टोला तेजस्वी यादव यांनी लागवला.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निकालापूर्वी हार मानली आहे. भाजपचे नेतेच म्हणतात, प्रादेशिक पक्षांशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे निकालानंतर राजकीय उलथापाथ होणार असून भाजपसह नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हे दोन्ही पक्ष लूप्त होणार आहेत, अस तेजस्वी यादव म्हणाले. बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून तेजस्वी यादव सध्या मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

देशाला राहुल गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान हवा आहे. जो गरीबांची काळजी घेऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या बोलण्यात आणि कृतीत मोठे अंतर आहे. ते अभिनेत्री प्रियंका चोपडाच्या घरी जावू शकतात. परंतु, गरीबाच्या घरी जाण्याचे टाळतात. तर राहुल गांधी गरीबां पाठिसी असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.

यावेळी तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या घोषणापत्रातील 'न्याय' योजनेसाठी राहुल यांचे आभार मानले. या योजनेचा सर्वाधिक लाभ गरीबांना होणार असल्याचे ते म्हणाले. गरीबांच्या खात्यात पैसा येण्यास सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असही तेजस्वी म्हणाले. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात दारुबंदी करण्यात आली. मात्र यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा झाला आहे. तसेच लोक अजुनही ब्लॅकमध्ये दारू विकून पैसा कमवत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा