शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'लोकसभा निकालानंतर मोदी-नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लुप्त होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:18 IST

बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून तेजस्वी यादव सध्या मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

नवी दिल्ली - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार असून निकालानंतर देशात राजकीय भूकंप होणार आहे. या राजकीय भूकंपानंतर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लूप्त होतील, असा टोला तेजस्वी यादव यांनी लागवला.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निकालापूर्वी हार मानली आहे. भाजपचे नेतेच म्हणतात, प्रादेशिक पक्षांशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे निकालानंतर राजकीय उलथापाथ होणार असून भाजपसह नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हे दोन्ही पक्ष लूप्त होणार आहेत, अस तेजस्वी यादव म्हणाले. बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून तेजस्वी यादव सध्या मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

देशाला राहुल गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान हवा आहे. जो गरीबांची काळजी घेऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या बोलण्यात आणि कृतीत मोठे अंतर आहे. ते अभिनेत्री प्रियंका चोपडाच्या घरी जावू शकतात. परंतु, गरीबाच्या घरी जाण्याचे टाळतात. तर राहुल गांधी गरीबां पाठिसी असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.

यावेळी तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या घोषणापत्रातील 'न्याय' योजनेसाठी राहुल यांचे आभार मानले. या योजनेचा सर्वाधिक लाभ गरीबांना होणार असल्याचे ते म्हणाले. गरीबांच्या खात्यात पैसा येण्यास सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असही तेजस्वी म्हणाले. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात दारुबंदी करण्यात आली. मात्र यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा झाला आहे. तसेच लोक अजुनही ब्लॅकमध्ये दारू विकून पैसा कमवत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा