शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:58 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी एनडीए असो वा विरोधी इंडिया आघाडीची राजधानीत बैठक सुरू आहेत. त्यात एनडीए सरकार आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जातं. ८ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मात्र नवीन सरकार स्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांच्या मागण्या वाढल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीतीश कुमार यांच्या जेडीयूने ४ केंदीय मंत्रालयाची मागणी केली आहे. तर चिराग पासवान यांनी २, जीतनराम मांझी यांनी १ आणि टीडीपीनेही ४ मंत्रालयाची मागणी केली आहे. लोकसभा निकालात भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळालं परंतु भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी घटक पक्षांची गरज भाजपाला लागणार आहे. अशावेळी घटक पक्षांनी नव्या सरकारमध्ये अधिकच्या मंत्रालयाची मागणी केली आहे. 

आज एनडीएची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, जेडीयू नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यासह इतर नेते हजर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला २४० जागा जिंकता आल्या. तर टीडीपी १६, जेडीयू १२, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला ७, चिराग पासवान यांना ५ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नव्या सरकार स्थापनेत घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच घटक पक्षांची मागणी वाढली आहे. 

सर्वात मोठा पक्ष पण आनंद नाही...

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या, सर्वात मोठा पक्ष बनला परंतु भाजपामध्ये आनंदाचं वातावरण नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपा पक्षाच्या जागा बहुमतापासून दूर आहेत. एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपा नेत्यांना २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही प्रचंड बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी इंडिया आघाडीने त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकलं. सर्वात मोठा फटका भाजपाला उत्तर प्रदेशात बसला. त्याठिकाणी केवळ ३३ जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलं. मागील निवडणुकीत इथं ६२ जागांवर भाजपा विजयी झाली होती. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे बहुमत असल्याने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू शकतील परंतु या सरकारमध्ये प्रादेशिक घटक पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी