शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:58 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी एनडीए असो वा विरोधी इंडिया आघाडीची राजधानीत बैठक सुरू आहेत. त्यात एनडीए सरकार आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जातं. ८ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मात्र नवीन सरकार स्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांच्या मागण्या वाढल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीतीश कुमार यांच्या जेडीयूने ४ केंदीय मंत्रालयाची मागणी केली आहे. तर चिराग पासवान यांनी २, जीतनराम मांझी यांनी १ आणि टीडीपीनेही ४ मंत्रालयाची मागणी केली आहे. लोकसभा निकालात भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळालं परंतु भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी घटक पक्षांची गरज भाजपाला लागणार आहे. अशावेळी घटक पक्षांनी नव्या सरकारमध्ये अधिकच्या मंत्रालयाची मागणी केली आहे. 

आज एनडीएची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, जेडीयू नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यासह इतर नेते हजर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला २४० जागा जिंकता आल्या. तर टीडीपी १६, जेडीयू १२, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला ७, चिराग पासवान यांना ५ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नव्या सरकार स्थापनेत घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच घटक पक्षांची मागणी वाढली आहे. 

सर्वात मोठा पक्ष पण आनंद नाही...

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या, सर्वात मोठा पक्ष बनला परंतु भाजपामध्ये आनंदाचं वातावरण नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपा पक्षाच्या जागा बहुमतापासून दूर आहेत. एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपा नेत्यांना २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही प्रचंड बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी इंडिया आघाडीने त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकलं. सर्वात मोठा फटका भाजपाला उत्तर प्रदेशात बसला. त्याठिकाणी केवळ ३३ जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलं. मागील निवडणुकीत इथं ६२ जागांवर भाजपा विजयी झाली होती. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे बहुमत असल्याने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू शकतील परंतु या सरकारमध्ये प्रादेशिक घटक पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी