शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

Lok Sabha Election Result 2024 : हाताच्या जाेरावर ‘सपा’ची सायकल सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:32 IST

Lok Sabha Election Result 2024: मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे.

- राजेंद्र कुमारलखनौ : '४०० पार'चा नारा देत देशातील सर्वाधिक ८० लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपचे बडे नेते मोदी-योगी यांची जादू चालली नाही. उत्तर प्रदेशातील राजकुमार असा भाजपच्या नेत्यांनी उल्लेख केलेल्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय रथ रोखला. त्यामुळे उत्तर प्रदेशात सर्व ८० जागा जिंकण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला केवळ ३६ जागा मिळाल्या आहेत, तर सपा आणि काँग्रेसने ४३ जागांवर मजल मारली आहे. यामध्ये सपा ३७ जागांवर, तर काँग्रेस ७ जागांवर जिंकली आहे. येथे मायावतींच्या बसपा पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे. यूपीमध्ये अखिलेश-राहुल जोडीला हलक्यात घेण्याचा आणि जनतेप्रती उदासीनता दाखविणाऱ्या सर्व खासदारांना मैदानात उतरवण्याचा अतिआत्मविश्वास भाजपला महागात पडल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अखिलेश आणि राहुल यांनी ज्या प्रकारे पीडीए (मागास आणि अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक जागेवर उमेदवार उभे केले, त्यामुळे त्यांना भाजपवर दबाव आणण्याची संधी मिळाली. जनतेनेही महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या  सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

विरोधक का जिंकले?-    यावेळी अखिलेश आणि राहुल यांनी मागासवर्गीय कार्डावर डाव खेळला. पीडीएचा फॉर्म्युला, जात जनगणना, आरक्षण आणि संविधान, बेरोजगारी हे मुद्दे मांडण्यात आले. हा डाव यशस्वी झाला.-    यावेळी काँग्रेस आणि सपाने मुस्लिम मते मिळवण्यासाठी अत्यंत संयमाने काम केले. मुस्लिम उमेदवारांना तिकीट देताना खबरदारी घेण्यात आली. या पक्षांच्या मुस्लिम उमेदवारांनीही प्रक्षोभक वक्तव्ये करण्यापासून स्वतःला दूर ठेवले. त्याचा फायदा असा झाला की, बसपाने २२ मुस्लिम उमेदवार उभे केल्यानंतरही मुस्लिम मतांचे विभाजन झाले नाही.-    काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी एकत्र प्रचार केला. प्रचारापासून ते मतदानापर्यंत त्यांनी स्थापन केलेल्या समन्वय समित्यांमध्ये जम बसवला. आप आणि डावे पक्षही एकत्र आले. त्याचा परिणाम झाला आणि इंडिया आघाडीची मते विभागली गेली नाहीत.-    उत्तर प्रदेशात भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास होण्याचे एक कारण म्हणजे भाजपच्या उमेदवारांबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी.

या विजयाने काय होईल?-    आता यूपीचे राजकारण बदलणार आहे.-    काँग्रेस आणि सपा मिळून आता भाजपच्या धोरणांना धारेवर धरतील.-    महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर राजकारण होणार आहे.-    भाजप सरकारने संस्थांवर निर्माण केलेला दबाव विरोधकांमुळे कमकुवत होणार आहे.-    गरीब, शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर योगी सरकारला कोंडीत पकडणे सुरू होईल.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Samajwadi Partyसमाजवादी पार्टी