शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:30 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित केले. 

चंदिगड - Narendra Modi on Congress ( Marathi News ) शीख समुदायासाठी भावनेचा मुद्दा असलेल्या करतारपूर कॉरिडोर भारतात नसल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटियाला येथील जाहीर सभेत खंत व्यक्त केली. जर १९७१ च्या युद्धात विजयी झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारनं योग्य बोलणी केली असती तर करतारपूर साहिब भारताचा हिस्सा असतं असं त्यांनी म्हटलं. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात ९० हजाराहून अधिक पाक सैन्यानं आत्मसमर्पण केलं होतं. जर त्यावेळी आम्ही सत्तेत असतो तर पाकिस्तानी सैन्याच्या सुटकेअगोदार करतारपूर साहिब भारतात घेतलं असतं असं मोदींनी म्हटलं आहे.

१९७१ च्या युद्धावेळी काय घडलं?

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून १९७० च्या सुरुवातीला पूर्व पाकिस्तानातील शरणार्थी भारतात येत होते. त्यावेळी बांग्लादेशाच्या मागणीसाठी आवामी लीगचे नेते शेख मुजीबुर्रहमान यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात मोर्चा उघडला होता. शरणार्थींची वाढती संख्या पाहता भारतानं त्यात हस्तक्षेप केला त्यामुळे पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. डिसेंबर १९७१ मध्ये १३ दिवसांसाठी संघर्ष चालला. त्यात भारतीय लष्कराकडून ९३ हजार पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांवर सरेंडर करण्याची वेळ आणली. 

१६ डिसेंबरला जनरल नियाजी यांनी आत्मसमर्पण पत्रकावर सही केली आणि नव्या बांग्लादेशाच्या निर्मितीसह पाकिस्तानी सैन्याची सुटका करण्यात आली. जवळपास ६ महिन्यानंतर जुलै १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पीएम जुल्फिकार अली भुट्टो यांच्या शिमला करार झाला. विजयानंतर भारताने लाइन ऑफ कंट्रोलला सप्टेंबर १९७१ च्या स्थितीला मान्यता दिली. या करारात दोन्ही देश काश्मीरसह द्विपक्षीय प्रकरणी कुठल्याही मध्यस्थताशिवाय सोडवण्यावर सहमती बनली. तज्ज्ञांच्या मते, या करारात भारतानं अशी कुठलीही अट ठेवली नाही ज्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला असता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतारपूर साहिबचा उल्लेख करत एकाच दगडात २ निशाणे साधले आहेत. त्यात पहिले शीख मतदारांना आकर्षिक करणे आणि दुसरे काँग्रेसला या मुद्द्यावरून घेरणं. 

दरम्यान, भाजपा पहिल्यांदाच पंजाबमध्ये १३ लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढत आहे. त्याचं कारण पंजाबमधील बहुतांश जागांवर चौरंगी लढत होत आहे. १९९८ ते २०१८९ पर्यंत शिरोमणी अकाली दलसोबत भाजपा विधानसभा, लोकसभा लढत आली. आघाडीत भाजपाला ४ जागा मिळत होत्या. २००४ मध्ये भाजपाचे सर्वाधिक ४ खासदार होते. २००९ मध्ये केवळ १ जागा आणि १० टक्के मते मिळाली. २०२२ च्या विधानसभेत भाजपाला केवळ २ जागा आणि ६.६ टक्के मते पडली. हिंदुत्ववादी पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर येत भाजपानं या निवडणुकीत अकाली दल, काँग्रेस आणि आपच्या शीख नेत्यांना पक्षात घेतले. ३ जागांवर महिला उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये विजयासाठी भाजपाला १० टक्क्यांहून अधिक मतांची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024