शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:28 IST

Lok Sabha Election 2024: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या एका विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही, असा इशारा भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी दिला आहे.  मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यााबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहे. आज भारत शक्तिशाली आहे. तसेच जर पाकिस्ताननं डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. सध्या कांग्रेसचे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत, अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली.  

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनीही मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर टीका केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामधून काँग्रेसच्या मनातील भीती आणि दहशत दिसत आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम आहे. काँग्रेसचे नेते राहतात भारतात पण त्यांच्या मनात मात्र पाकिस्तान भरलेला आहे. पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

तर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या निवडणुकीत राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे उघड झाली आहे. पाकिस्तानचं समर्थक करा, दहशतवाद्यांशी संबंधित संघटनांचं समर्थन करा. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लूट करा, हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला.  

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानबाबत बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले होते की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे.  तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतंय. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी जगभरात पाकिस्तानलला कमीपणा देतोय, असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील कुठलाही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करू शकतो, अशी भीती मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केली होती.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारतPakistanपाकिस्तान