शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:28 IST

Lok Sabha Election 2024: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या एका विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही, असा इशारा भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी दिला आहे.  मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यााबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहे. आज भारत शक्तिशाली आहे. तसेच जर पाकिस्ताननं डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. सध्या कांग्रेसचे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत, अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली.  

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनीही मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर टीका केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामधून काँग्रेसच्या मनातील भीती आणि दहशत दिसत आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम आहे. काँग्रेसचे नेते राहतात भारतात पण त्यांच्या मनात मात्र पाकिस्तान भरलेला आहे. पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

तर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या निवडणुकीत राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे उघड झाली आहे. पाकिस्तानचं समर्थक करा, दहशतवाद्यांशी संबंधित संघटनांचं समर्थन करा. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लूट करा, हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला.  

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानबाबत बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले होते की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे.  तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतंय. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी जगभरात पाकिस्तानलला कमीपणा देतोय, असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील कुठलाही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करू शकतो, अशी भीती मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केली होती.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारतPakistanपाकिस्तान