शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 11:18 IST

Lok Sabha Election 2024: राजीव गांधी यांनी पाकिस्तानसोबत युद्ध होण्याची शक्यता असताना शांततेचा मार्ग निवडला होता. आजच्या काळातही पाकिस्तानसोबत शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र नरेंद्र मोदी हे युद्धाचा मार्ग शोधत आहेत,अशी टीका मणिशंकर अय्यर यांनी केली. 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यादरम्यान, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांन केलेल्या दोन विधानांमुळे काँग्रेसची कोंडी झाली होती. त्यातच आता वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामुळे प्रचार ऐन रंगात आला असताना पुन्हा एकदा वाद ओढवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.

एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानबाबत भाष्य करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे.  तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतंय. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी जगभरात पाकिस्तानलला कमीपणा देतोय, असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील कुठलाही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करू शकतो.

अय्यर पुढे म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत तसे ते आमच्याकडेही आहेत. मात्र जर कुणी माथेफिरूने लाहोरमध्ये अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर त्याचा किरणोत्सार अमृतसरपर्यंत पोहोचण्यास ८ सेकंदही लागणार नाहीत. जर आम्ही त्यांचा सन्मान केला तर ते शांत राहतील. मात्र आपण त्यांना कमीपणा देत राहिलो तर त्यांच्यापैकी कुणीतरी माथेफिरू येईल आणि बॉम्ब टाकेल, असा इशारा मणिशंकर अय्यर यांनी दिला.  

आम्ही सत्तेत असताना भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दृढ करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मागच्या १० वर्षांमध्ये सगळ्या चर्चा बंद पडल्या आहेत. समोरच्याकडे फारसं बळ नसेल तेव्हाच आपण बळ दाखवलं पाहिजे. त्यांचं बळ रावळपिंडीमधील कहुटा येथे आहे. जर काही गैरसमज निर्माण झाला तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. मणिशंकर अय्यर पुढे म्हणाले की, राजीव गांधी यांनी पाकिस्तानसोबत युद्ध होण्याची शक्यता असताना शांततेचा मार्ग निवडला होता. आजच्या काळातही पाकिस्तानसोबत शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र नरेंद्र मोदी हे युद्धाचा मार्ग शोधत आहेत,अशी टीका मणिशंकर अय्यर यांनी केली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४IndiaभारतPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी