शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 18:29 IST

Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) जातिनिहाय जनगणनेबाबत (caste-based census) आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस (Congress) पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे जातिनिहाय जनगणनेला प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनवण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून राहुल गांधी जातिनिहाय जनगणनेबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

आनंद शर्मा यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामधून आनंद शर्मा यांनी जातिनिहाय जनगणना हा काही रामबाण उपाय नसल्याचे म्हटले आहे. तसेच असं करणं म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाच्या अपमान करण्यासारखं ठरेल, असंही आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टीकोनाची आठवण काढताना या पत्रामधून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दिलेल्या घोषणांचेही उदाहरण दिले. पक्षाची सध्याची भूमिका ही मागच्या काँग्रेस सरकारच्या विचारसरणीसोबत जुळत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांना चिखलफेक करण्याची संधी मिळणार आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. तसेच त्यांनी १९८० मध्ये काँग्रेसने दिलेल्या ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हातपर’ या घोषणेचाही हवाला दिला.

या पत्रामधून आनंद शर्मा यांनी राजीव गांधी यांच्या एका वक्तव्याचंही उदाहरण दिलं आहे. त्यात १९९० मध्ये विरोधी पक्ष नेते असलेले राजीव गांधी यांनी सांगितले होते की, जर आपल्या देशात जातिवाद प्रस्थापित करण्यासाठी जातीची व्याख्या केली जात असेल, तर त्यापासून आम्हाला अडचण आहे. जर संसदीय आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जातिवाद हा एक विषय बनला तर त्यामुळे आपल्यासाठी समस्या निर्माण होतील. अशा परिस्थितीत काँग्रे बघ्याची भूमिका घेऊन या देशाचं विभाजन होत असलेलं बघत राहू शकणार नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे