शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 18:29 IST

Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) जातिनिहाय जनगणनेबाबत (caste-based census) आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस (Congress) पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे जातिनिहाय जनगणनेला प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनवण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून राहुल गांधी जातिनिहाय जनगणनेबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

आनंद शर्मा यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामधून आनंद शर्मा यांनी जातिनिहाय जनगणना हा काही रामबाण उपाय नसल्याचे म्हटले आहे. तसेच असं करणं म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाच्या अपमान करण्यासारखं ठरेल, असंही आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टीकोनाची आठवण काढताना या पत्रामधून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दिलेल्या घोषणांचेही उदाहरण दिले. पक्षाची सध्याची भूमिका ही मागच्या काँग्रेस सरकारच्या विचारसरणीसोबत जुळत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांना चिखलफेक करण्याची संधी मिळणार आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. तसेच त्यांनी १९८० मध्ये काँग्रेसने दिलेल्या ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हातपर’ या घोषणेचाही हवाला दिला.

या पत्रामधून आनंद शर्मा यांनी राजीव गांधी यांच्या एका वक्तव्याचंही उदाहरण दिलं आहे. त्यात १९९० मध्ये विरोधी पक्ष नेते असलेले राजीव गांधी यांनी सांगितले होते की, जर आपल्या देशात जातिवाद प्रस्थापित करण्यासाठी जातीची व्याख्या केली जात असेल, तर त्यापासून आम्हाला अडचण आहे. जर संसदीय आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जातिवाद हा एक विषय बनला तर त्यामुळे आपल्यासाठी समस्या निर्माण होतील. अशा परिस्थितीत काँग्रे बघ्याची भूमिका घेऊन या देशाचं विभाजन होत असलेलं बघत राहू शकणार नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे