शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 11:30 IST

काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. दरम्यान, काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले होते. यावर आता भाजपाने प्रत्यु्त्तर दिले आहे.  

राहुल गांधी ट्विट करुन म्हणाले की, मला किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणुकीवरील सार्वजनिक चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीही निमंत्रण स्वीकारतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने लगेचच पलटवार करत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का असा सवाल केला. निवृत्त न्यायाधीश मदन बी लोकूर, भारतीय कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी लिहिलेल्या पत्राला राहुल गांधींनी उत्तर दिले होते.

PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल

या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी दोन्ही नेत्यांना निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी एका व्यासपीठावर आमंत्रित केले होते. त्यांनी देशाच्या नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, चर्चेचा प्रस्ताव हा पक्षविरहित आणि प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हिताचा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी काय म्हणाले?

"लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी देशासमोर त्यांचे व्हिजन एका व्यासपीठावर मांडणे हा एक सकारात्मक उपक्रम असेल," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'देशाला आशा आहे की पंतप्रधान मोदी चर्चेत सहभागी होतील. मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी निमंत्रणावर चर्चा केली आणि त्यांनी सहमती दर्शवली की अशा चर्चेत लोकांना आमचा दृष्टिकोन समजण्यास मदत होईल आणि पर्यायी मार्ग काढता येईल, असंही राहुल गांधी म्हणाले.

या आमंत्रणाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "आपल्या पक्षांवर लावले जाणारे कोणतेही बिनबुडाचे आरोप थांबवणे देखील महत्त्वाचे आहे. निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष म्हणून, जनतेने त्यांच्या नेत्यांचे थेट ऐकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मी, किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चेत सहभागी होण्यास आनंद होईल."

अर्थपूर्ण आणि ऐतिहासिक चर्चेत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही गांधी म्हणाले. पंतप्रधान सहभागी होण्यास सहमत आहेत का, त्यानंतर आम्ही चर्चेचे तपशील आणि स्वरूप यावर चर्चा करू, असंही राहुल गांधी म्हणाले.

भाजपचा पलटवार

तेजस्वी सूर्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त  केली. 'ते काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, इंडिया आघाडीचा विषय सोडा. राहुल गांधी कोण आहेत ज्यांच्याशी पीएम मोदींनी वाद -विवाद करावा? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, आधी त्यांना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला लावा. त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांना चर्चेसाठी निमंत्रण द्या, असे सांगावे. तोपर्यंत आम्ही आमच्या बीजेवायएमचे प्रवक्ते त्यांना कोणत्याही चर्चेत पाठवण्यास तयार आहोत, असंही तेजस्वी सूर्या म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४