शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 11:30 IST

काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. दरम्यान, काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले होते. यावर आता भाजपाने प्रत्यु्त्तर दिले आहे.  

राहुल गांधी ट्विट करुन म्हणाले की, मला किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणुकीवरील सार्वजनिक चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीही निमंत्रण स्वीकारतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने लगेचच पलटवार करत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का असा सवाल केला. निवृत्त न्यायाधीश मदन बी लोकूर, भारतीय कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी लिहिलेल्या पत्राला राहुल गांधींनी उत्तर दिले होते.

PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल

या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी दोन्ही नेत्यांना निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी एका व्यासपीठावर आमंत्रित केले होते. त्यांनी देशाच्या नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, चर्चेचा प्रस्ताव हा पक्षविरहित आणि प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हिताचा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी काय म्हणाले?

"लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी देशासमोर त्यांचे व्हिजन एका व्यासपीठावर मांडणे हा एक सकारात्मक उपक्रम असेल," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'देशाला आशा आहे की पंतप्रधान मोदी चर्चेत सहभागी होतील. मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी निमंत्रणावर चर्चा केली आणि त्यांनी सहमती दर्शवली की अशा चर्चेत लोकांना आमचा दृष्टिकोन समजण्यास मदत होईल आणि पर्यायी मार्ग काढता येईल, असंही राहुल गांधी म्हणाले.

या आमंत्रणाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "आपल्या पक्षांवर लावले जाणारे कोणतेही बिनबुडाचे आरोप थांबवणे देखील महत्त्वाचे आहे. निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष म्हणून, जनतेने त्यांच्या नेत्यांचे थेट ऐकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मी, किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चेत सहभागी होण्यास आनंद होईल."

अर्थपूर्ण आणि ऐतिहासिक चर्चेत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही गांधी म्हणाले. पंतप्रधान सहभागी होण्यास सहमत आहेत का, त्यानंतर आम्ही चर्चेचे तपशील आणि स्वरूप यावर चर्चा करू, असंही राहुल गांधी म्हणाले.

भाजपचा पलटवार

तेजस्वी सूर्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त  केली. 'ते काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, इंडिया आघाडीचा विषय सोडा. राहुल गांधी कोण आहेत ज्यांच्याशी पीएम मोदींनी वाद -विवाद करावा? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, आधी त्यांना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला लावा. त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांना चर्चेसाठी निमंत्रण द्या, असे सांगावे. तोपर्यंत आम्ही आमच्या बीजेवायएमचे प्रवक्ते त्यांना कोणत्याही चर्चेत पाठवण्यास तयार आहोत, असंही तेजस्वी सूर्या म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४