शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ४ टक्के मतं आणि जुळणार ‘४०० पार’चं गणित, लक्ष्य गाठण्यासाठी मोदींचा असा आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 09:00 IST

Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. मात्र समोर येत असलेल्या काही खास आकडेवारीकडे पाहिल्यास नरेंद्र मोदींनी दिलेलं ४०० पारचं लक्ष्य हे कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं दिसत आहे. तसेच भाजपा आणि एनडीए हे लक्ष्य गाठू शकतात, असं दिसून येत आहे. मात्र या मार्गामध्ये अनेक अडथळेही आहेत. 

मोदीच्या अबकी बार ४०० पारवर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्नही रास्त आहेत. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये सुमारे २४ पक्ष समाविष्ट आहेत. तर दुसरीकडे एनडीएमध्ये एकट्या भाजपाने मागच्या वेळी ३०३ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हे भाजपाच्या ३०३ जागांना ३७० जागांपर्यंत आणि एनडीएला ४०० जागांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ४० वर्षांपूर्वी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वबळावर ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. आता मोदींनी भाजपा आणि एनडीएसमोर ४०० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सद्यस्थितीत भाजपा आणि एनडीएला हे लक्ष्य गाठण्यासाठी ४ टक्के अधिक मतांची गरज आहे. ही अतिरिक्त मतं मिळवल्यास भाजपाचं ४०० पारचं लक्ष्य पूर्ण होऊ शकतं. 

१९८४ मध्ये काँग्रेसने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा कांग्रेसला ४९.१ टक्के मतं मिळाली होती. तर २०१९ मध्ये भाजपाने विजय मिळवला तेव्हा एनडीएला ४४.४८ टक्के मतं मिळाली होती. त्यात एकट्या भाजपाला ३७.३६ टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच काँग्रेसला १९८४ मध्ये मिळालेल्या मतांपर्यंत पोहोचण्यासाठी एनडीएला ४.२६ टक्के मतांची आवश्यकता आहे. असं झाल्यास एनडीएला ४०० पार मजल मारता येईल. 

मात्र हे तितकंस सोपं नाही याची मोदी आणि भाजपाला जाणीव आहे. हे शक्य होण्यासाठी देशभरात सरकारबाबत सकारात्मक वातावरण असणं आवश्यक आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यात काँग्रेस ४०० पार पोहोचली होती. यावेळी राम मंदिरामुळे आपल्या बाजूने वातावरण निर्माण होईल, अशी भाजपाला आशा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभा