शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आणखी ४ टक्के मतं आणि जुळणार ‘४०० पार’चं गणित, लक्ष्य गाठण्यासाठी मोदींचा असा आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 09:00 IST

Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. मात्र समोर येत असलेल्या काही खास आकडेवारीकडे पाहिल्यास नरेंद्र मोदींनी दिलेलं ४०० पारचं लक्ष्य हे कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं दिसत आहे. तसेच भाजपा आणि एनडीए हे लक्ष्य गाठू शकतात, असं दिसून येत आहे. मात्र या मार्गामध्ये अनेक अडथळेही आहेत. 

मोदीच्या अबकी बार ४०० पारवर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्नही रास्त आहेत. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये सुमारे २४ पक्ष समाविष्ट आहेत. तर दुसरीकडे एनडीएमध्ये एकट्या भाजपाने मागच्या वेळी ३०३ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हे भाजपाच्या ३०३ जागांना ३७० जागांपर्यंत आणि एनडीएला ४०० जागांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ४० वर्षांपूर्वी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वबळावर ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. आता मोदींनी भाजपा आणि एनडीएसमोर ४०० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सद्यस्थितीत भाजपा आणि एनडीएला हे लक्ष्य गाठण्यासाठी ४ टक्के अधिक मतांची गरज आहे. ही अतिरिक्त मतं मिळवल्यास भाजपाचं ४०० पारचं लक्ष्य पूर्ण होऊ शकतं. 

१९८४ मध्ये काँग्रेसने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा कांग्रेसला ४९.१ टक्के मतं मिळाली होती. तर २०१९ मध्ये भाजपाने विजय मिळवला तेव्हा एनडीएला ४४.४८ टक्के मतं मिळाली होती. त्यात एकट्या भाजपाला ३७.३६ टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच काँग्रेसला १९८४ मध्ये मिळालेल्या मतांपर्यंत पोहोचण्यासाठी एनडीएला ४.२६ टक्के मतांची आवश्यकता आहे. असं झाल्यास एनडीएला ४०० पार मजल मारता येईल. 

मात्र हे तितकंस सोपं नाही याची मोदी आणि भाजपाला जाणीव आहे. हे शक्य होण्यासाठी देशभरात सरकारबाबत सकारात्मक वातावरण असणं आवश्यक आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यात काँग्रेस ४०० पार पोहोचली होती. यावेळी राम मंदिरामुळे आपल्या बाजूने वातावरण निर्माण होईल, अशी भाजपाला आशा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभा