शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:34 IST

Lok Sabha Election 2024: पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये. भाजपाने (BJP) ३१० जागांचा टप्पा ओलांडला. आहे. तर काँग्रेसला (Congress) यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे, असा टोला अमित शाह (Amit Shah) यांनी लगावला आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचं पाच टप्प्यातील मतदान आटोपलं असून, आता शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या मतदानामधून देशातील वारे कुठल्या दिशेने वाहताहेत याचा अंदाज घेतला जात आहे. वेगवेगळे राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत वेगवेगळे दावे करत असताना आता भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या निवडून येणाऱ्या जागांबाबत मोठं भाकित केलं आहे.  पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये. भाजपाने ३१० जागांचा टप्पा ओलांडला. आहे. तर काँग्रेसला यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे भाजपा उमेदवार जगदंबिका पाल यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत अमित शाह म्हणाले की, पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीचा सफाया झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत. तर अखिलेश यादव यांचे चार उमेदवारही जिंकून येणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो, असा दावा अमित शाह यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पीओके भारताचा भाग आहे आणि भाजपा तो परत मिळवेल. पाकिस्तानचे नेते म्हणतात की, पीओके त्यांचा आहे. काँग्रेसचे नेतेही सांगतात की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यांना मी सांगतो की, भाजपाचे लोक अणुबॉम्बला घाबरत नाहीत. पीओके भारताचा भाग होता, आहे आणि पुढेबी राहील, तसेच आम्ही तो परत मिळवू.  

यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी परदेशात सुट्टीवर जाण्यासाठीची तिटिकं बुक केली आहेत. एकीकडे राहुल गांधी हे इटली, थायलंड आणि बँकॉकसाठी रवाना होतात, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी २३ वर्षांमध्ये कधीही सुट्टी घेतलेली नाही. एवढंच नाही तर ते आपली दिवालीसुद्धा सैनिकांसोबत साजरी करतात. भाजपाने निवृत्त सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजना सुनिश्चित केली. तसेच आता नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावाही अमित शाह यांनी केला.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४