शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बेरोजगारी, शेतकरी समस्या सोडविणे राष्ट्रवादच : तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:22 AM

मोदीजी सध्या राष्ट्रवादाची भाषा करतात. परंतु, जनतेच्या मुद्दावर ते बोलत नाहीत. विकासाचं राजकारण न करता विनाशाचं राजकारण भाजपने केले आहे. मात्र देशातील युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवादच असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडाडून टीका करताना दिसत आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. केवळ राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रवादाचा मुद्दा नसून देशातील मुलभूत समस्या सोडविणे देखील राष्ट्रवादच असल्याचं तेजस्वी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मोदीजी सध्या राष्ट्रवादाची भाषा करतात. परंतु, जनतेच्या मुद्दावर ते बोलत नाहीत. विकासाचं राजकारण न करता विनाशाचं राजकारण भाजपने केले आहे. मात्र देशातील युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवादच असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. महायुतीतून नितीश कुमार गेले ते बरचं झालं. ते जिथे जातील त्यांना बुडवतील अशी त्यांची प्रतिमा असल्याची घाणाघाती टीका तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली.

यावेळी तेजस्वी यादव यांनी लोकांना उद्देशून नितीश कुमार यांच्याविरुद्ध नारा दिला. 'ऐसा कोई सगा नाही, जिसे पलटू चाचाने ठगा नही'. याचा अर्थ असा होतो की, नितीश कुमार यांच्या जवळचा एकही व्यक्ती असा नाही, ज्याचा त्यांनी विश्वासघात केला नाही. लालू प्रसाद यादव यांनी कायम भाजपविरुद्ध लढा दिला आहे. कधीही मागे हटले नाही. परंतु, नितीश कुमार हे पलटू चाचा असल्याचे तेजस्वी म्हणाले.

पंतप्रधापदासाठी नितीश कुमार यांचे प्रयत्न

स्वत:ला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षीत यश मिळणार नाही. निकालानंतर भाजपला स्थिती बिघडणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार