शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नरेंद्र मोदींचा समान नागरी कायद्याकडे इशारा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:16 IST

लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी आहे, असं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला फाटा दिल्याचे चित्र आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती-पातीचे राजकारण सोडण्याकडे इशारा देत देशात केवळ दोनच जाती राहणार असल्याचे म्हटले. अर्थात मोदींनी समान नागरिक कायद्यासाठी प्रयत्न करणार, अस तर मोदींना म्हणायचं नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी. जातीच्या नावावर खेळ खेळणाऱ्या लोकांवर या निवडणुकीत प्रहार करण्यात आला आहे. गरीबा आणि गरीबी दूर करणारी या दोनच जाती देशात राहणार असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या जाती संदर्भातील वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २०१४ मध्ये समान नागरिक कायद्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मागील पाच वर्षांच्या काळात त्यावर काहीही हालचाल झाली नाही.

दरम्यान २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे समान नागरिक कायद्यासंदर्भात भाजप विचार करण्याची शक्यता आहे. मात्र जातीवादावर अंकूश आणण्यासाठी समान नागरिक कायदा आणण्याच्या विचारात भाजप आहे का, हे येणारा काळच सांगणार आहे. भाजपला दिलेल्या प्रचंड बहुमतानंतर मोदींनी नजतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हटले.

देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. या दोन राज्यांत भाजप नेत्यांनी ज्याप्रमाणे विजय मिळवला, त्यावर जाणकारांच्या मते जनता आता जातीच्या राजकारणातून बाहेर आल्याचे दिसून येते

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत