शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा समान नागरी कायद्याकडे इशारा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:16 IST

लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी आहे, असं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला फाटा दिल्याचे चित्र आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती-पातीचे राजकारण सोडण्याकडे इशारा देत देशात केवळ दोनच जाती राहणार असल्याचे म्हटले. अर्थात मोदींनी समान नागरिक कायद्यासाठी प्रयत्न करणार, अस तर मोदींना म्हणायचं नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी. जातीच्या नावावर खेळ खेळणाऱ्या लोकांवर या निवडणुकीत प्रहार करण्यात आला आहे. गरीबा आणि गरीबी दूर करणारी या दोनच जाती देशात राहणार असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या जाती संदर्भातील वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २०१४ मध्ये समान नागरिक कायद्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मागील पाच वर्षांच्या काळात त्यावर काहीही हालचाल झाली नाही.

दरम्यान २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे समान नागरिक कायद्यासंदर्भात भाजप विचार करण्याची शक्यता आहे. मात्र जातीवादावर अंकूश आणण्यासाठी समान नागरिक कायदा आणण्याच्या विचारात भाजप आहे का, हे येणारा काळच सांगणार आहे. भाजपला दिलेल्या प्रचंड बहुमतानंतर मोदींनी नजतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हटले.

देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. या दोन राज्यांत भाजप नेत्यांनी ज्याप्रमाणे विजय मिळवला, त्यावर जाणकारांच्या मते जनता आता जातीच्या राजकारणातून बाहेर आल्याचे दिसून येते

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत