शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 14:13 IST

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी मोठा रोड शो केला होता. या रोड शोला एनडीएमधील विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. त्याचवेळी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना संबोधीत केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी वाराणसीवासीयांना म्हटले होते की, आता आपण विजयानंतरच धन्यवाद करण्यासाठी वाराणसीत येणार आहोत. परंतु, विरोधाकांनी वाराणसीत प्रचारासाठी आखलेल्या योजनाबद्ध कार्यक्रमामुळे मोदी वाराणसीतील विजयासाठी सांशक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदींनी आपला प्रचार कार्यक्रम बदलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत. १६ मे रोजी मोदी मिर्झापूरमध्ये अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर रात्री विश्रांतीसाठी वाराणसीत दाखल होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी येथून उमेदवार असल्याने वाराणसीत थांबणार आहेत. तसेच १७ मे रोजी वाराणसीत जाहीर सभा घेणार असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जो व्यक्ती वाराणसीतील रहिवासी नाही, अशा व्यक्तीला मतदानाच्या दिवशी वाराणसीत थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु, लोकसभेच्या उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे.

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत. तर सपा-बसपा युतीकडून शालिनी यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. शालिनी यांच्यासाठी अखिलेश यादव आणि मायावती संयुक्त सभा घेणार आहेत.

दरम्यान विरोधकांच्या योजनाबद्ध प्रचारामुळे पंतप्रधान मोदींचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी आधीच वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह मागील तीन दिवसांपासून वाराणसीतील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. या व्यतिरिक्त अनेक केंद्रीयमंत्री कार्नर सभा घेताना दिसत आहेत.

वास्तविक पाहता पंतप्रधान मोदी मतदानापूर्वी वाराणसीत मुक्कामी राहण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी देखील मोदी शेवटचे तीन दिवस वाराणसीत होते. त्यानंतर २०१७ मध्ये देखील मोदींनी तीन दिवस वारासणीत काढले होते. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशातील पूर्व भागात मोठे यश मिळाले होते. हाच फॉर्म्युला आता पुन्हा एकदा अंमलात आणला जात आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शहा