शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 14:13 IST

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी मोठा रोड शो केला होता. या रोड शोला एनडीएमधील विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. त्याचवेळी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना संबोधीत केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी वाराणसीवासीयांना म्हटले होते की, आता आपण विजयानंतरच धन्यवाद करण्यासाठी वाराणसीत येणार आहोत. परंतु, विरोधाकांनी वाराणसीत प्रचारासाठी आखलेल्या योजनाबद्ध कार्यक्रमामुळे मोदी वाराणसीतील विजयासाठी सांशक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदींनी आपला प्रचार कार्यक्रम बदलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत. १६ मे रोजी मोदी मिर्झापूरमध्ये अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर रात्री विश्रांतीसाठी वाराणसीत दाखल होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी येथून उमेदवार असल्याने वाराणसीत थांबणार आहेत. तसेच १७ मे रोजी वाराणसीत जाहीर सभा घेणार असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जो व्यक्ती वाराणसीतील रहिवासी नाही, अशा व्यक्तीला मतदानाच्या दिवशी वाराणसीत थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु, लोकसभेच्या उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे.

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत. तर सपा-बसपा युतीकडून शालिनी यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. शालिनी यांच्यासाठी अखिलेश यादव आणि मायावती संयुक्त सभा घेणार आहेत.

दरम्यान विरोधकांच्या योजनाबद्ध प्रचारामुळे पंतप्रधान मोदींचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी आधीच वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह मागील तीन दिवसांपासून वाराणसीतील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. या व्यतिरिक्त अनेक केंद्रीयमंत्री कार्नर सभा घेताना दिसत आहेत.

वास्तविक पाहता पंतप्रधान मोदी मतदानापूर्वी वाराणसीत मुक्कामी राहण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी देखील मोदी शेवटचे तीन दिवस वाराणसीत होते. त्यानंतर २०१७ मध्ये देखील मोदींनी तीन दिवस वारासणीत काढले होते. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशातील पूर्व भागात मोठे यश मिळाले होते. हाच फॉर्म्युला आता पुन्हा एकदा अंमलात आणला जात आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शहा