शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
4
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
5
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
6
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
7
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
8
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
9
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
10
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
11
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
12
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
14
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
15
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
16
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
17
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
18
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
19
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
20
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 14:13 IST

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी मोठा रोड शो केला होता. या रोड शोला एनडीएमधील विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. त्याचवेळी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना संबोधीत केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी वाराणसीवासीयांना म्हटले होते की, आता आपण विजयानंतरच धन्यवाद करण्यासाठी वाराणसीत येणार आहोत. परंतु, विरोधाकांनी वाराणसीत प्रचारासाठी आखलेल्या योजनाबद्ध कार्यक्रमामुळे मोदी वाराणसीतील विजयासाठी सांशक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदींनी आपला प्रचार कार्यक्रम बदलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत. १६ मे रोजी मोदी मिर्झापूरमध्ये अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर रात्री विश्रांतीसाठी वाराणसीत दाखल होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी येथून उमेदवार असल्याने वाराणसीत थांबणार आहेत. तसेच १७ मे रोजी वाराणसीत जाहीर सभा घेणार असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जो व्यक्ती वाराणसीतील रहिवासी नाही, अशा व्यक्तीला मतदानाच्या दिवशी वाराणसीत थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु, लोकसभेच्या उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे.

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत. तर सपा-बसपा युतीकडून शालिनी यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. शालिनी यांच्यासाठी अखिलेश यादव आणि मायावती संयुक्त सभा घेणार आहेत.

दरम्यान विरोधकांच्या योजनाबद्ध प्रचारामुळे पंतप्रधान मोदींचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी आधीच वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह मागील तीन दिवसांपासून वाराणसीतील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. या व्यतिरिक्त अनेक केंद्रीयमंत्री कार्नर सभा घेताना दिसत आहेत.

वास्तविक पाहता पंतप्रधान मोदी मतदानापूर्वी वाराणसीत मुक्कामी राहण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी देखील मोदी शेवटचे तीन दिवस वाराणसीत होते. त्यानंतर २०१७ मध्ये देखील मोदींनी तीन दिवस वारासणीत काढले होते. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशातील पूर्व भागात मोठे यश मिळाले होते. हाच फॉर्म्युला आता पुन्हा एकदा अंमलात आणला जात आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शहा