शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Kashmir Terror Attack: भारतीय जवानांवर याआधी कधी झाले होते मोठे हल्ले; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:25 PM

जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. यावेळी दहशतवाद्यांनी बसमधून जाणाऱ्या सुरक्षा जवानांना लक्ष्य केलं आहे. पुलवामातल्या अवंतीपुरातल्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले असून, सीआरपीएफचे 35हून अधिक जवान जखमी आहेत. जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेले हा हल्ला काही पहिला नाही. यापूर्वीही दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं आहे. जाणून घ्या कधी कधी झाले जवानांवर दहशतवादी हल्ले

2016मध्ये उरीतल्या लष्करी तळावर दहशतवादी भीषण हल्ला केला होता. हा हल्ला जम्मू-काश्मीरमधल्या उरी सेक्टरजवळच्या एलओसीजवळच्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 18 जवान शहीद झाले आहेत. जवानांच्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले होते. हा भारतीय लष्करावर 20 वर्षांनंतर करण्यात आलेला सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हातात शस्त्र नसलेल्या रात्रीच्या वेळी झोपेत असलेल्या जवानांवर हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइकही केले होते. 

  • 29 नोव्हेंबर 2016- जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटामध्ये लष्करी कॅम्पवर हल्ला

29 नोव्हेंबर 2016ला जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटा इथल्या लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर लष्कराचे 7 जवान शहीद झाले होते. या हल्लात दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले होते. 

  • 27 एप्रिल 2017- कुपवाड्यातील पंजगाममध्ये सेनेच्या लष्करी कॅम्पवर हल्ला

27 एप्रिल 2017ला कुपवाड्यातील पंजगाम येथे लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं होतं. तर तीन भारतीय जवान शहीद झाले होते. 

  • 5 जून 2017 – बांदीपोऱ्यातील संबलमध्ये CRPFच्या कॅम्पवर हल्ला

5 जून 2017 ला बांदीपोऱ्यातील संबळमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्करानं चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

  • 26 ऑगस्ट 2017- पुलवामा पोलीस लाइनमध्ये दहशतवादी हल्ला

26 ऑगस्ट 2017ला पुलवाम्यातील पोलीस लाइनमध्येही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं. 10-11 फेब्रुवारी 2018लाही सुंजवा इथल्या लष्कराच्या तळावर हल्ला झाला होता, ज्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर 6 जवान शहीद झाले होते. 

  • 2019मध्ये आतापर्यंत 28 दहशतवादी मारले गेले

2019ला 28 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. तर 2014मध्ये 866 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 2018मध्ये जवळपास 614 दहशतवादी घटना घडल्या. 2018मध्ये 91 सुरक्षा जवान शहीद झाले. 2018मध्ये 257 दहशतवादी मारले गेले. 2017मध्ये 213 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. तर लष्कराचे 80 जवान शहीद झाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी