शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

प्रभू राम, कृष्ण यासारखेच नरेंद्र मोदी दैवी अवतार; भाजपा मंत्र्यांनी सांगितले मोदी का जन्मले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:43 IST

आपल्या धर्म आणि संस्कृतीत म्हटलं आहे की, जेव्हा कधीही भारतावर कोणतं संकट येईल अथवा अत्याचार वाढेल तेव्हा दैवी अवतार जन्माला येईल असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे.

भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग देशात मोठ्या प्रमाणात आहे. २०१४ पासून देशात मोदी लाट आली आणि एकेकाळी २ जागा मिळालेल्या भाजपानं थेट केंद्रात सरकार बनवलं. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपानं पक्ष म्हणून बहुमताचा आकडा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा करिष्मा असल्याचं बोललं जातं त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्याही वाढली. आता मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेता कमल पटेल यांनी मोदींना दैवी अवताराची उपमा देऊन टाकली आहे.

कमल पटेल म्हणाले की, देशात काँग्रेसकडून सुरु असलेला अत्याचार, भ्रष्टाचार आणि देशाच्या संस्कृती रक्षणासाठी, नैराश्य असलेले वातावरण संपुष्टात आणण्यासाठी प्रभू राम आणि कृष्णाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही दैवी अवतार म्हणून जन्माला आलेत. सोमवारी हरदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटेल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींद्वारे करण्यात येत असलेली कार्य भारताला विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणं आणि लोकांचे कल्याण करणं हे सामान्य व्यक्तींकडून पूर्ण होऊ शकत नाही असं ते म्हणाले.

तसेच आपल्या धर्म आणि संस्कृतीत म्हटलं आहे की, जेव्हा कधीही भारतावर कोणतं संकट येईल अथवा अत्याचार वाढेल तेव्हा दैवी अवतार जन्माला येईल. प्रभू राम हे मनुष्य अवतारात आले होते आणि राक्षस रावणाला मारुन आणि अन्य वाईट शक्तींना हरवून लोकांची रक्षा करत रामराज्याची स्थापना केली होती. कंसचे अत्याचार वाढले म्हणून भगवान कृष्ण जन्माले आले आणि कंसची क्रूरता संपवून सर्वसामान्यांना दिलासा दिला असं कमल पटेल यांनी सांगितले.

यासाठी झाला मोदींचा जन्म

दरम्यान, अशाप्रकारेच जेव्हा काँग्रेसचा अत्याचार वाढला, भ्रष्टाचार वाढला, जातीवाद वाढला. देशाची संस्कृती नष्ट व्हायला लागली. चहुबाजूने नैराश्याचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा हे संपवण्यासाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरु बनणार आहे. ज्यांनी लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि सर्वसामान्यांचे कल्याण केले. हे अशक्य कार्य आहे जे साधारण मनुष्य पूर्ण करू शकत नाही. जरी शक्य असतं तरी ६० वर्ष लागली असती. त्यासाठी नरेंद्र मोदींसारख्या अवतारी पुरुषाचा जन्म झाला आणि त्यांनी हे कार्य पूर्ण केले. ते दैवी अवतार आहेत असं कमल पटेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी